🏔️ Medical student from Australia- James Scott
🏔️ "There" no one can survive more than 3 days
🏔️ Love of sister Joanne and her massive efforts
🏔️ Karate training, presence of mind, discipline and determination
🏔️ Surviving with memories of dear ones, love and just snow!
🏔️ Extracting strength from little things
🏔️ Rinpoche Tharangu Lama- "He is there"
🏔️ Courage, confidence and stubborn attitude of Australians
🏔️ "You are god, because no human can survive here!"
🏔️ Unexpected circumstances after the rescue
Hello! Recently I read this book- "Lost in the Himalayas- James Scott's 43- day ordeal" ! I had heard one podcast earlier. On today’s "Student day" this book presents great many things to learn! As things are vividly written in present, this book is unputable. James Scott, a 22 year old medical student from Australia comes to Nepal for a study tour! In some off days, he does a small trek. After some days, he goes for another trek and gets lost! Even after many days, his whereabouts are not known! Finally his sister Joanne rushes to Nepal to search him! This book is written by both of them. They both narrate developments of this saga.
Showing posts with label Lama. Show all posts
Showing posts with label Lama. Show all posts
Friday, September 5, 2025
Trapped in Himalaya for 43 days- James Scott!
Sunday, May 27, 2012
लोब्संग राम्पा: एक महागाथा.........
स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी स्वत:चं वर्णन “पाश्चात्य जगावर बाँबप्रमाणे कोसळलो,” असं केलं आहे. अगदी त्या धर्तीवर “पाश्चात्य आणि सर्व जगावर कोसळलेला एक महामानव,” असं लोब्संग राम्पा ह्यांचं वर्णन करता येईल. हा एक खराखुरा महापुरुष- श्रेष्ठ लामा आणि तिबेटी वीरपुरुष- गेल्या शतकात होऊन गेला. दुस-या महायुद्धाच्या काळखंडात त्याने असामान्य संघर्ष केला.... त्याचं एक पुस्तक हातात घेतलं. कधी पूर्ण झालं कळलंच नाही. मग दुसरं. मग तिसरं. त्या तीन पुस्तकांचं रसग्रहण आणि लोब्संग राम्पा कोण होता, ह्याचं आकलन करण्याचा हा एक प्रयत्न....

द थर्ड आय
द थर्ड आय म्हणजेच मराठीत भाषांतरित झालेलं ‘तृतीय नेत्र’ हे लोब्संग राम्पा (१९११- १९८१) ह्यांचं पहिलं पुस्तक. पुस्तकाची सुरुवात चार वर्षाच्या लोब्संगपासून होते. चार वर्षांचा लोब्संग घोड्यावर बसायला शिकत असतो आणि त्सूबाबा ह्या शिक्षकाकडून स्वसंरक्षण-कला शिकत असतो. तिबेटी प्रथेप्रमाणे सातव्या वाढदिवशी लोब्संगचं भविष्य वर्तवलं जातं. त्याचं भविष्य उज्ज्वल असतं, तो महान पद प्राप्त करणार असतो; परंतु त्याचं आयुष्य संघर्षमय असतं आणि त्याच्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय असतं. त्यानंतर लगेचच तो ल्हासा जवळच्या चाकपोरी आश्रमात दाखल होतो. तिबेटमधील उच्च दर्जाच्या निवडक आश्रमांपैकी हा एक आश्रम. आश्रमात प्रवेश घेण्यापासून त्याची खडतर परीक्षा सुरू होते. तीन दिवस त्याला आश्रमाच्या बाहेर एका स्थितीत अजिबात हालचाल न करता बसावं लागतं. ही आश्रमाची चाचणी असते! आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण होतो. मग हळुहळु आश्रमाच्या पद्धती, गुरूजन, सहविद्यार्थी ह्यांची त्याला ओळख होते. त्याचे गुरू मिंग्यार डोंडूप लामाश्री त्याला घडवण्यास सुरुवात करतात. आधीपासून त्याची आध्यात्मिक उन्नती झालेली असल्यामुळे व ह्या जन्मात एका मोठ्या ध्येयाची पूर्तता हे त्याचं दायित्व असल्यामुळे त्याला इतरांपेक्षा खडतर प्रशिक्षण मिळतं. आश्रमातल्या कठोर वातावरणामध्ये तो पारंपारिक विद्यार्जन करतो.
एक वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याची योग्यता एका पातळीवर पोचते. भावी जीवनातील कार्य पूर्ण करण्यासाठी डोंडूप लामाश्री व अन्य गुरूजन मिळून त्याच्या कपाळावर विशेष अशी शस्त्रक्रिया करतात व त्याचा तृतीय नेत्र जागृत करतात. तिबेटी मान्यतेनुसार प्राचीन काळी मानवामध्ये आज असाधारण वाटणा-या अनेक शक्ती होत्या आणि प्रत्येकाजवळ तिसरा डोळाही होता; पण काळाच्या ओघात जसं मानवाचं स्खलन झालं, तशा ह्या शक्ती संपत गेल्या. फक्त काही पुण्यवान आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तीच त्या शक्तींसह जन्म घेऊ शकतात. आश्रमात लोब्संगचे जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणाबरोबरच त्याच्या आध्यात्मिक शक्तींना सक्रिय करण्यात येतं आणि म्हणूनच त्याचा तिसरा डोळा सुरू केला जातो. कपाळावरचं ऑपरेशन झाल्यावर काही दिवस त्याला आराम करावा लागतो. शस्त्रक्रियेचं वर्णन, इतर संदर्भ आणि तपशील (उदा., डोळे बंद असल्यामुळे त्याला अंधा-या खोलीत ठेवलं, काही दिवसानंतर एक मंद पणती लावली, रोज तिची वात थोडी थोडी मोठी करत नेली व हळुहळु डोळ्यांना उजेडाची सवय केली) मूळातून वाचण्यासारखे आणि अत्यंत विस्मयजनक आहेत. तिस-या डोळ्यामुळे त्याला माणसांचे विचार व शारीरिक स्थिती उत्तम प्रकारे दिसते. तिबेटी आध्यात्मात सांगितलेला ऑरा- वलय त्याला दिसतात. प्रत्येक माणसाच्या वलयाच्या रंगावरून आणि स्थितीवरून त्याची मन:स्थिती, विचार, शारीरिक स्थिती ह्या गोष्टी त्याला समजू लागतात. ह्या सर्व वर्णात तिबेटी आध्यात्मिक प्रगती, तिबेटी संस्कृती ह्यावर प्रकाश टाकला गेला आहे. आणि अनेक गोष्टी चमत्कारिक व विस्मयजनक असल्या तरी त्या सुसंबद्ध आहेत.
चाकपोरी आश्रमात डोंडूप लामाश्रींच्या हातांखाली लोब्संगचं प्रशिक्षण पुढेही सुरू राहतं. त्याला लामापद प्राप्त होतं. तिबेटी वैद्यकशास्त्र, शल्यक्रिया आदिमध्ये तो पारंगत होतो. आश्रमामध्ये दर वर्षी दुर्मिळ वनौषधींसाठीच्या सहलीचा एक कार्यक्रम असतो. त्यात तो भाग घेतो. दूरवरच्या आणि ल्हासापेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या प्रदेशात जाऊन तो वनौषधी आणण्याच्या मोहिमेत सहभागी होतो. तिबेटमधील पतंग उडवण्याच्या पद्धतीचंही वर्णन छान आहे. हे पतंग म्हणजे ग्लायडरसारखे मोठे असतात. त्यातून उंच डोंगरावर काही लोक थोडा वेळ हवाई भ्रमण करू शकतात. तिबेटी गुरूकुल पद्धती, आध्यात्मिक परंपरा, जीवनपद्धती ह्यांचं वर्णन सुंदर आहे.
ल्हासामधील तेरावे दलाई लामा डोंडूप लामाश्रींचे मित्र असतात आणि लोब्संगवरही त्यांचा जीव असतो. लोब्संगच्या तिस-या नेत्राचं काम इथे सुरू होतं. दलाई लामांना भेटायला विविध लोक- राजकीय पाहुणे येत असतात. ह्या पाहुण्यांचे उद्देश नक्की कसे आहेत, त्यांचे अंत:स्थ विचार काय आहेत, हे त्यांना लोब्संगकडून काढून घ्यायचं असतं. दलाई लामा लोब्संगवर प्रसन्न होतात. ल्हासाच्या पोताला आश्रमाचं वर्णन दिलं आहे. एकदा डोंडूप लामाश्री व लोब्संग आश्रमाच्या सर्वसामान्यांना प्रतिबंधित असलेल्या आणि फक्त उच्च लामांना खुल्या असलेल्या जमिनीखालच्या भागात जातात. तिबेटी परंपरेतील वैभवशाली वास्तु, पुरातन ग्रंथ, आध्यात्मिक साधनं इत्यादि तिथे असतात. आणखी गूढ अशाही ब-याच गोष्टी असतात.
त्यानंतर वनौषधी आणण्यासाठी तिबेटच्या एका अतिदुर्गम प्रदेशातील थरारक मोहिमेचं वर्णन दिलं आहे. तिबेटच्या उत्तर- पश्चिम भागामधील चांग- तांग ह्या पर्वतीय प्रदेशात डोंडूप लामाश्रींच्या नेतृत्वाखाली एक मोहिम जायला निघते. कित्येक महिने चालणा-या ह्या मोहिमेसाठी भरपूर सामग्री, घोडे, तट्टं इत्यादी तयारी केली जाते. तिबेटचा हा अतिदुर्गम भाग असतो. ल्हासा व आसपासच्या प्रदेशाची उंची ४००० ते ५००० मीटर आहे; पण चांग तांग ह्या उत्तर पश्चिम तिबेटमधील भागाची उंची ७००० ते ८००० मीटर असते आणि प्रवास पूर्णत: अशक्यप्राय असतो. बर्फाचे डोंगर, द-या, रस्त्यांचा अभाव, प्रतिकूल वातावरण, संपूर्ण निर्मनुष्य अशा सर्व परिस्थितीत मोहीम सुरू राहते. कित्येक साथीदार व घोडे आजारी पडतात. त्यांना वाटेतल्या एका शेवटच्या मुक्काम करण्यायोग्य ठिकाणी ठेवून उरलेले लोक पुढे जातात. खडतर प्रवास सुरूच राहतो. सर्व जण गळून जातात. सर्वांचे हाल होतात. तेव्हा कुठे चांग- तांग पर्वतीय प्रदेशात ते पोचतात. तिथलं हवामान सुखद व आल्हाददायक असतं. वनौषधींचा शोध घेता घेता त्यांना एक अतिप्राचीन नगरी सापडते. परत असाच खडतर प्रवास करत करत कित्येक महिन्यांनी ते मानवी प्रदेशात येतात. प्रवासाचे तपशील वाचण्यासारखे आहेत. वर्णन असामान्य असलं तरी अतिरंजित आणि अतिरेकी नाही. आपण नकाशात पाहिलं तर चांग तांग हा भाग आपल्याला तिबेटच्या वायव्य सीमेजवळ अक्साई चीनच्या दक्षिणेला आणि लदाखच्या पूर्वेला दिसतो........ अद्भुत...... असंच हे वर्णन आहे.
दहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर लोब्संगचं तिबेटमधलं शिक्षण पूर्ण होतं आणि वयाच्या अठराव्या वर्षी तो वरिष्ठ लामा होतो (सुमारे १९२९). जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक शिक्षणाची गरज असते; म्हणून तो तिबेट सोडतो. चीनच्या मध्यभागात असलेल्या चुंगकिंग (आजचे Chongqing) ह्या शहरात जाण्यासाठी तो निघतो. घर, आई- वडील ह्यांची त्याची आधीच ताटातूट झालेली असते. आणि तिबेटमध्ये आगामी येणा-या संकटांच्या संदर्भात भावी आयुष्यातल्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी चुंगकिंगला जायला निघताना लोब्संगची गुरूजी, आदरणीय दलाई लामा व मातृभूमी तिबेट ह्यांचीही ताटातूट होते आणि इथेच ‘द थर्ड आय’ हे पुस्तक समाप्त होतं.......................

डॉक्टर फ्रॉम ल्हासा
मराठीतलं तृतीय नेत्र वाचून झाल्यावर विलक्षण कुतूहल निर्माण झालं. इंटरनेटवर थोडं सर्च केलं आणि लगेच लोब्संग राम्पा ह्याच्या विषयी भरपूर माहिती मिळाली आणि त्याची पुस्तकंही डाऊनलोड करून वाचता आली! त्यामुळे लोब्संग राम्पाच्या जीवनयात्रेची महागाथा पुढे वाचता आली! डॉक्टर फ्रॉम ल्हासा हे त्यांचं दुसरं पुस्तक. ‘द थर्ड आय’ जिथे संपतं, तिथून हे पुस्तक सुरू होतं. निवडक साथीदार आणि तंदुरुस्त घोड्यांसोबत लोब्संगचा प्रवास चुंगकिंगच्या दिशेने सुरू होतो.... प्रवासवर्णन, जीवनशैली, तिबेटची माहिती ह्यांचं अत्यंत सुंदर मिश्रण ह्यात आहे. तिबेट हा अतिउंचीवरील प्रदेश. सरासरी उंची चार हजार मीटर आणि विलक्षण थंड हवामान. त्यामुळे जसे ते अतिउंचीवरून कमी उंचीच्या प्रदेशात येतात, तशा त्यांना अडचणी येतात. शरीराला कमी उंचीच्या वातावरणाची सवयच नसते. त्यामुळे उष्ण हवामान, जास्त घनतेची हवा ह्याचा त्यांना खूप त्रास होतो. तोपर्यंत चिनी संस्कृतीही सुरू झालेली असते. सर्व बदलांचा त्रास होतो. तरीही त्यांचा प्रवास सुरू राहतो. रात्री वाटेत लागणा-या एखाद्या मठात मुक्काम करत प्रवास सुरू राहतो. आणि हे मठ दलाई लामांच्याच परंपरेतलेच असे नसतात. परंतु कोणत्याही विचारधारेचा मठ असला, तरी यात्रेकरूंची व्यवस्था केली जाते! उष्ण प्रदेश, दमट हवामान, वादळी वारे ह्यांचा सामना करत करत ते पुढे जातात. एका टप्प्यावर आल्यावर त्यांना पक्का रस्ता लागतो आणि तिथून चार चाकांच्या वाहनांची वाहतुक सुरू होते! नवीन जगच सुरू होतं.
यांगत्सेच्या किनारी असलेलं चुंगकिंग हे तत्कालीन चीनमधलं एक मुख्य ज्ञानकेंद्र व बाजारपेठ असते. लोब्संग शहरी जीवन, काही प्रमाणात पाश्चात्य प्रभाव पहिल्यांदाच बघतो. तिथल्या एका वैद्यकशास्त्र महाविद्यालयात तो प्रवेश घेतो. त्याचे गुरूजी व दलाई लामांच्या ओळखीमुळे त्याची व्यवस्था होते. वैद्यक शास्त्रातलं त्याचं ज्ञान तपासलं जातं. त्याचं कठोर प्रशिक्षण व ज्ञान ह्यामुळे त्याचं ज्ञान अर्थातच भरपूर असतं. फक्त मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन विषय त्याला पूर्णपणे नवीन असतात! आणि इथेच गमती- जमती होतात! इलेक्ट्रिक करंट शिकवतानाच्या प्रात्यक्षिकामध्ये ‘करंट’ काय असतो, ह्याचं प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थ्यांना छोटा शॉक देऊन करंट म्हणजे काय, हे शिकवलं जातं. परंतु आध्यात्मिक साधनेमुळे लोब्संगला करंटची जाणीवच होत नाही (फक्त किंचित उष्णता जाणवते). काही तरी गडबड झाली, असं बघून शिक्षक जेव्हा स्वत: हात लावतात, तेव्हा त्यांना मात्र मोठा धक्का बसतो!! असंच मॅग्नेटिझमच्या प्रात्यक्षिकामध्ये होतं. लोब्संगला तिस-या डोळ्यामुळे चुंबकीय क्षेत्र दिसत असतं आणि हेच त्याच्या शिक्षकांना कोड्यात टाकतं. ह्या चिनी महाविद्यालयात अमेरिकन पद्धतीने वैद्यकशास्त्र शिकवलं जात असतं. तिबेटी पद्धत व पारंपारिक ज्ञान व अमेरिकन ज्ञान ह्यांच्यासंदर्भात वर्णन छान आहे. पाश्चात्य उथळ ज्ञानापेक्षा पौर्वात्य ज्ञानात जास्त शहाणपणा व खोली आहे, असं लोब्संगचं मत असतं. अनेकदा त्रास देणा-या आडदांड लोकांना लोब्संग मानेतली एक नस दाबून एका क्षणात लोळवतो. त्याचं आधुनिक वैद्यकशास्त्राचं शिक्षण सुरू राहतं.
योगायोगाने त्याची ओळख एका चिनी पायलटशी होते. हळुहळु उत्सुकतेपोटी तो त्यांच्याकडून विमान उडवण्याचं तंत्र शिकून घेतो आणि एकदा चक्क विमान उडवतो! त्याचं कौशल्य पाहून चैंग- कै- शेकचे लोक त्याला चिनी विमानदळात घेऊ इच्छितात. परंतु ह्यावेळीच अनेक दुर्घटनांना सुरुवात होते. चुंगकिंगमधले लोब्संगचे एक ओळखीचे लामा प्राणत्याग करतात. त्याचवेळी त्याला त्याचे गुरूजी- डोंडूप लामाश्री ह्यांनीही प्राणत्याग केल्याचं कळतं. तो न राहवून शोक करायला लागतो. त्याचा शोक पाहून डोंडूप लामाश्री सूक्ष्म देहाने येऊन त्याचं सांत्वन करतात आणि त्याला पुढच्या खडतर प्रसंगांना सामोरं जाण्यास सांगतात. त्यातून तो सावरला नसतानाच बातमी येते की आदरणीय दलाई लामा लवकरच शरीर सोडणार आहेत. त्याला आणि आणखी एका लामाला ल्हासाला येण्यासाठी मानसिक दूरसंवेदन- टेलिपॅथी पद्धतीने निरोप दिला जातो. एक वरिष्ठ लामा असूनही भावना आवरणं त्याला जड जातं. सत्वर तो ल्हासाला यायला निघतो. ह्यावेळी मात्र त्याच्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत (जिथे रस्ता जाऊ शकतो तिथपर्यंत!) एका मजबूत अमेरिकन गाडीची व्यवस्था केली जाते. ही गाडी दिवसरात्र प्रवास करून त्याला अर्ध्या वाटेवर रस्ता संपतो तिथे असलेल्या एका मठात आणून सोडते. ह्या मठातल्या मठाध्यक्षालासुद्धा टेलिपॅथी संदेश आलेला असल्यामुळे त्याने एक मजबूत घोडा लोब्संगसाठी तयार ठेवलेला असतो!
लोब्संग ल्हासामध्ये गुरूजी व आदरणीय दलाई लामांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहून आणि सहाध्यायी, मित्र आदिंचा अखेरचा निरोप घेतो. तिबेटी पद्धतीप्रमाणे दलाई लामांचा मृतदेह विशेष प्रकारे जतन करून पवित्र वास्तूत ठेवला जातो. विशेष म्हणजे त्यांचं मस्तक वारंवार पूर्वेकडे वळतं!! ह्याचं कारण म्हणजे पूर्वेकडून येणा-या (चिनी आक्रमणाच्या) संकटाबद्दल ते अखंड सावधानतेचा इशारा देत असतात. लोब्संग ल्हासाला अखेरचा रामराम करून तो चुंगकिंगच्या दिशेने घोड्यावरून सुसाट निघतो. मुक्कामाच्या मठामध्ये नवीन घोडा घेऊन तो न थांबता प्रवास करतो. परत त्याला तीच मजबूत गाडी मिळते आणि अखेरिस तो चुंगकिंगला येऊन पोचतो.
त्या वेळी चुंगकिंगमध्ये हळुहळु जपानी आक्रमणाच्या बातम्या येत असतात. अनेक भागांमध्ये जपानी कारवाया सुरू झालेल्या असतात. त्याला चैंग-कै शेकच्या अधिका-यांचा निरोप मिळतो. तो चिनी विमानदलात एक वैद्यकीय अधिकारी म्हणून दाखल होतो! आक्रमणाच्या तणावामुळे शांघायजवळ परिस्थिती बिघडत असते व तिथल्या वैद्यकीय सेवेसाठी तो शांघायला येतो. काही काळाने म्हणजे ७ जुलै १९३७ रोजी मार्को पोलो पूल ओलांडून जपानी सेना शांघायवर हल्ला करते. ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’मधला इथून पुढचा भाग म्हणजे खरीखुरी युद्धकथाच आहे. विपरित परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही साधनांशिवाय रुग्णसेवा करत असताना जपानी लोक लोब्संगला पकडतात. त्याचे असंख्य हाल करतात. त्याने प्रश्नांची उत्तरं द्यावीत म्हणून अत्यंत क्रूर हाल करतात. उलटे टांगून हात गळ्याशी बांधणे, नखं कापून त्यात मीठ चोळणे, उपाशी ठेवणे, आगीवर टांगून ठेवणे आणि असंख्य. कित्येक दिवस, आठवडे व महिने ते त्याचा छळ करतात, पण तो “मी चिनी सेनेत अधिकारी आहे व युद्धकैदी आहे,” ह्याव्यतिरिक्त काहीच सांगत नाही. प्रचंड अत्याचार सहन केल्यानंतर तो कसाबसा तुरुंगवासातून मृतदेहाचं सोंग घेऊन निसटतो आणि एका वृद्ध चिनी माणसाच्या मदतीने परत चैंग- कै- शेकच्या चिनी सैन्याला मिळतो. काही दिवस चुंगकिंगमध्ये राहतो. त्यावेळी चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चुंगकिंगचीही रया गेलेली असते. तिथेही हल्ले सुरू झालेले असतात. थोडा आराम करून व जुन्या लोकांना भेटून तो परत युद्धभूमीवर येतो. रुग्णसेवा करत असतानाच परत पकडला जातो. पुन: भयानक छळ आणि हाल. परत एकदा तो निसटतो आणि एका युरोपीयन व्यक्तीच्या घरी जातो. पण तो जपानी लोकांना सामील झालेला असल्यामुळे लोब्संग परत एकदा जपानी लोकांच्या तावडीत सापडतो. सर्वत्र जपानच्या विजयाच्या बातम्या येत असतात.
लोब्संग माहिती देत नसल्यामुळे ते त्याचा अविरत छळ करतात. पण कठोर परिश्रम आणि आध्यात्मिक प्रगतीच्या बळावर लोब्संग टिकाव धरतो. छळामुळे होणा-या वेदनांचा सामना करण्यासाठी त्याला वेदनांवरून मनाचं ध्यान दूर न्यायचं असतं. त्यासाठी तो जुन्या आठवणी, गुरूंचे उपदेश व गतकालीन प्रसंग आठवतो. चांग- तांग पर्वतीय प्रदेशातील त्यांचा प्रवास, प्राचीन नगरी, तिथली उपकरणे, तिथे दिसलेले यती इत्यादी त्याला आठवतात. मधून मधून गुरू सूक्ष्म रूपाने येऊन त्याला प्रेरणा देतात. शेवटी त्याला एका महिला कैद्यांच्या कँपचा डॉक्टर म्हणून काम देतात. त्या भागात मिळणा-या वनस्पतींचा वापर कुशलतेने करून तो ट्रॉपिकल अल्सरसारख्या भितीदायक रोगावर औषधोपचार तयार करतो. कैद्यांना गोळा करून साधनं तयार करतो. श्वासाचा परिणामकारक वापर करून वेदना कशा कमी जाणवतील, ह्यासाठी कैद्यांना प्रशिक्षण देतो. परंतु काही दिवसांतच त्याला पुन: बंदी करून जपानमधल्या तुरुंगात आणलं जातं. शांघायहून जवळजवळ एक मृतदेह म्हणून जपानच्या मुख्यभूमीपर्यंतच्या प्रवासाचं केलेलं वर्णन थरारक आणि भीषण आहे. युद्ध आणि साम्राज्यवाद असेल, तर नाव कोणतंही असो, वास्तव सैतानाचा साक्षात्कार, हेच असतं हे दिसतं.....
जपानच्या मुख्यभुमीतील हिरोशिमाजवळच्या एका बंदिवासात लोब्संगला ठेवण्यात येतं. सततच्या छळामुळे व शरिरावर झालेल्या असंख्य आघातांमुळे तो अत्यंत अशक्त असतो आणि कित्येक दिवस पडून असतं. त्याचं स्थळ- काळाचं भान शिल्लक राहात नाही. फक्त ह्या तुरुंगात समुद्रातून कोणत्या मार्गाने आलो, तितकं त्याला लक्षात असतं. लोब्संग कमालीचा अशक्त असतो. अशक्त लोब्संगच्या सूक्ष्म देहाला उच्च लोकामध्ये बोलावलं जातं. तिथे लोब्संगला त्याचे गुरुजी व अन्य लामा भेटतात. ते त्याला सांगतात, “तू अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून जात आहेस. तुझ्या कष्टांना व हाल- अपेष्टांना मर्यादा नाहीत. तुझं शरीर खिळखिळं झालं आहे. आम्ही तुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही असा एक ब्रिटिश नागरिक बघितला आहे, जो प्राणत्याग करू इच्छितो. त्याचं शरीर तुला मिळू शकतं. पण अजून त्यासाठी सात वर्षं बाकी आहेत. तुला हर हवं असेल, तर तू शरीर सोडून आमच्यात येऊ शकतो; तुला कोणीही नाव ठेवणार नाही.” त्यावर लोब्संग त्याच्या विशेष ध्येयासाठी झुंजत राहण्याची इच्छा व त्याचा निर्धार बोलून दाखवतो. सूक्ष्म देह परत त्याच्या शरिरात येतो आणि त्याचा तुरुंगवास सुरू राहतो.
एके दिवशी लोब्संगला विमानाची घरघर ऐकू येते. त्याला माहिती असलेल्या विमानांपेक्षा ती वेगळी असते. तेवढ्यात बाहेर सर्वत्र हल्लकल्लोळ उठतो आणि सैनिक आरडाओरड सुरू करतात. सर्वत्र एकच थैमान सुरू होतं. “सम्राट, आम्हांला ह्या प्रलयापासून वाचवा,” असं सैनिक म्हणत असतात. लोब्संगने लिहिलं आहे, की तो हिरोशिमावरचा ६ ऑगस्ट १९४५ चा अणुबाँब होता आणि अर्थातच हे त्याला त्या वेळी समजलं नाही.. लोब्संगला जाणवतं की सर्व सैनिक प्रचंड भितीने पळत आहेत आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. तो इतका अशक्त असतो, की त्याच्या खोलीला कुलुपही नसतं. तो हळुच बाहेर पडतो. एका सैनिकाचे बूट व पोशाख घेऊन खुरडत खुरडत समुद्राच्या दिशेने पुढे जायला निघतो. कसा बसा तो किना-यावर पोचतो. सर्वत्र अराजकता असते, त्यामुळे त्याला कोणी अडवत नाही. वाळूत त्याला एक नाव दिसते. शक्ती एकवटून तो नावेपर्यंत जातो. त्यात त्याला काही मासे अन्न म्हणून ठेवलेले दिसतात. तो थोडेसे खातो आणि खूप जोर लावून नावेचा दोर तोडतो. नाव मोकळी होते आणि हळुहळु समुद्रात जाते......... असंख्य मरणयातना आणि अत्याचार सहन केल्यावर कित्येक वर्षांच्या तुरुंगवासातून तो मुक्त होतो........ आणि तिथेच ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’ भाग संपतो.

द राम्पा स्टोरी
आत्मचरित्राच्या ह्या तिस-या भागाच्या सुरुवातीला वर्तमानकाळातील काही संवाद आहेत. पण ते समोरासमोरचे किंवा दूरध्वनीवरचे नाहीत; तर सूक्ष्म रूपातील आहेत!! पहिले दोन भाग प्रकाशित झाल्यावर लोब्संगवर काही लोकांनी खूप टीका केलेली असते. खोटं आणि काल्पनिक लेखन असं त्याच्या लेखनाबद्दल बोललं जात असतं. त्याला त्याचे गुरूजी व अन्य लामा समजावून सांगतात, की त्याने लिहिणं खूप आवश्यक आहे. जे लोक आध्यात्मिक प्रवासात थोड्या तरी विकसित अवस्थेत आहेत, ते त्याचं सांगणं समजू शकतील. आणि इतरांनी जरी त्याच्या सांगण्याला खोटं म्हंटलं, तरी त्यांच्या अंतर्मनात त्याची नोंद होईल व योग्यवेळी त्यांनाही त्याची जाणीव होईल. म्हणून ते त्याला लिहिण्यास प्रेरित करतात. आधीच्या भागांकडे एक दृष्टीक्षेप टाकल्यावर आत्मचरित्र परत हिरोशिमामध्ये व तिथून बाहेर पडणा-या नावेच्या प्रवासाकडे येतं.....
कितीतरी दिवस, आठवडे, महिने लोब्संगची नाव समुद्रात जात राहते. त्याला स्थळ- काळाचं भान उरत नाही. नावेतले मासे आणि पावसाचं पाणी ह्यावर मधून मधून जागा होणारा लोब्संग पुढे पुढे जात राहतो....... कित्येक काळ उलटल्यावर त्याच्या कानावर काही शब्द ऐकू येतात. त्याची नाव किना-याला लागलेली असते आणि दोन तरुण किना-यावरून त्याच्याकडे येतात. ते त्याला ढकलून नाव स्वत:च्या ताब्यात घेतात. लोब्संग किना-यावर वाळूत बेशुद्ध पडलेला असतो.
शुद्धीवर आल्यावर लोब्संगला त्याला एका जागी आडवं केल्याचं दिसतं. त्याच्याजवळ पाणी व थोडं अन्न ठेवलेलं असतं. तो एका मठात असतो. त्याचे उघडलेले डोळे पाहून एक वृद्ध बौद्ध भिक्षु त्याच्याकडे येतात. दोघांची भाषा चिनी असली तरी त्यात बराच फरक असतो; पण हळुहळु संवाद सुरू होतो. ते भिक्षु त्याला सांगतात की ते वाळूत त्याला बघून शिष्यांना सांगून मठात आणतात. ते हेही सांगतात, की त्यांच्या मठात एक दिवस कोणी विशेष अतिथी येणार आहे, अशी त्यांना पूर्वीपासून सूचना देण्यात आली होती व केवळ त्या कारणासाठी ते वयोवृद्ध भिक्षु शेवटचा श्वास घेत जगत असतात. काही दिवस लोब्संग तिथे विश्रांती घेतो. परंतु नंतर ते भिक्षु त्याला समजावतात की त्याने फार काळ थांबून चालणार नाही, कारण धोका अजून संपलेला नाही आणि भिक्षुही राहणार नाहीत. तो मठ उत्तर कोरियामध्ये असतो (अर्थातच लोब्संगची नाव जपानच्या दक्षिण- पश्चिमेकडून समुद्र ओलांडून उत्तर कोरियाला लागलेली असते!!!). भिक्षुंचे शिष्य त्याला उनगीचा रस्ता सांगतात. उनगी उत्तर कोरियामध्ये रशियन सीमेपासून जवळ असतं (गावाचं आजचं नाव सोन्बोंग आहे आणि ते उत्तर कोरियामध्ये चीन व रशिया ह्यांच्या सीमेलगत आहे). मुख्य रस्त्यावरून न जाता बाजूने चालत चालत तो तिथपर्यंत जातो. चिनी आणि जपानी भाषेत लोकांना विचारत विचारत आणि थांबत थांबत जातो. उनगीमध्ये पोचल्यावर त्याला व्हॅलिडिओस्टॉककडे जायचं असतं. त्याला रशियन लाल फ्रंटियर पेट्रोलचे तीन सैनिक दिसतात. त्यांच्याजवळ पोलिसी कुत्रे असतात. त्याला बघून ते कुत्रे त्याच्यावर धावून येतात.... लोब्संग मनामध्ये त्या कुत्र्यांप्रति सद्भाव व्यक्त करून तो त्यांचा मित्र आहे, असा विचार व्यक्त करतो. कुत्रे त्याच्या अंगापर्यंत येऊन शांत होतात. सैनिकांना प्रचंड आश्चर्य वाटतं. ज्या अर्थी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला नाही, त्या अर्थी तो स्थानिक धर्मगुरू असावा, असं त्यांना वाटतं. ते प्रभावित होऊन त्याची मदत करतात. त्याला त्यांच्या गाडीतून व्हॅलिडिओस्टॉकलाही न्यायला तयार होतात.
व्हॅलिडिओस्टॉकमधल्या छावणीमध्ये पोलिसी कुत्र्यांनी वेगळीच समस्या निर्माण केलेली असते. कारण कम्युनिस्ट लाल सोव्हिएत राजवटीमध्ये सैनिक त्या कुत्र्यांना सतत बंडखोरांवर सोडत असतात व त्यामुळे मानवी रक्ताची चटक लागून ते कुत्रे नियंत्रणाबाहेर जात असतात. कुत्र्यांच्या एका दंगलीमध्ये 4 सैनिकसुद्धा ठार झालेले असतात. म्हणून हे सैनिक (त्यातला एक सार्जंट असतो) लोब्संगला कुत्र्यांना नियंत्रणात आणायला सांगतात. तो आणून दाखवतो. मग आणखी कुत्र्यांना नियंत्रणात आणण्याचा ‘पराक्रम’ लोब्संग करतो. त्याच्यामुळे तिथला वरिष्ठ अधिकारी इतका प्रभावित होतो, की त्याला लाल सोव्हिएत सेनेत तो त्याला मानाचं कॉर्पोरेल पद देतो! काही दिवस कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी ते लोब्संगला थांबवून घेतात, पैसे आणि इतर साधनं देतात. लोब्संग त्यांच्याकडून व्हॅलिडिओस्टॉकमधून मॉस्कोला जाणा-या ट्रान्स सैबेरियन रेल्वेच्या प्रवासाची माहिती काढून घेतो. सुरक्षा रक्षकांना चुकवत तो प्रवास कसा करता येईल, हे त्याच्या लक्षात येतं.......
तिथून पुढे त्याचा अखंड प्रवास सुरू होतो...... प्रवास, छळ आणि परत प्रवास. व्हॅलिडिओस्टॉकच्या पुढच्या एका गावात तो मॉस्कोला जाणा-या मालगाडीमध्ये बसतो. पुढे काही दिवसांनी बैकल सरोवराजवळ ती गाडी थांबते. तपासणीच्या वेळी तो ट्रेनमध्ये उतरून मग परत डब्यात चढतो. पण ह्यावेळी डब्यात अजून चार जण असतात. ते त्याच्यावर हल्ला करतात. पण तिबेटी युद्धकौशल्याने लोब्संग त्यांना लगेचच शांत करतो. मग ते त्याला सहकार्य करतात. मालगाडीमध्ये खायला धान्य व पदार्थ मिळतात. सैबेरियातल्या बर्फापासून पाणी मिळतं. निघाल्यापासून जवळजवळ चोवीस दिवसांनी लोब्संग मॉस्कोजवळ पोचतो. तिथून परत प्रवास, कैद, छळ, सुटका, प्रवास असं किती तरी महिने किंवा वर्षं सुरू राहतं. अखेरीस तो युक्रेन- पोलंडमार्गे चेकोस्लोव्हाकियामध्ये पोचतो (दुस-या महायुद्धातल्या जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण युद्धक्षेत्रातून जाऊन!). तिथून मग त्याचा छळ थोडा थोडा कमी होतो. परंतु पाश्चात्य जगातील पद्धती माहित नसल्यामुळे लोक त्याला फसवत राहतात. तरीही स्वत:च्या हुशारीवर असंख्य उद्योग करत तो चेकोस्लोव्हाकिया, इटली, जर्मनी, फ्रांसमार्गे अमेरिकेत पोचतो. ह्या सर्व प्रवासात ड्रायव्हर, इंजिनिअर, मर्चंट नेव्ही इंजिनिअर, रेडिओ निवेदक अशी कित्येक कामं तो करतो.
मधल्या कालावधीत तिबेटमध्ये चीनच्या लाल सेनेने आक्रमण करून तो देश गिळंकृत केलेला असतो (१९५०). सर्वत्र पारतंत्र्य आणि जुलुमशाही आलेली असते. ल्हासामधले मठ जाऊन तिथे नवीन कामगारगृहे येतात. सूक्ष्म रूपात लोब्संग हे पाहतो. सूक्ष्म रूपात त्याचं त्याच्या गुरुजींशी संभाषण होतं. ते त्याला सांगतात, की त्याच्या शरीराचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्याने आता तिबेटमध्ये जाऊन आत्मार्पण करावं, म्हणजे त्याचं शरीर पारंपारिक पद्धतीने जतन करता येईल आणि एका ब्रिटिश नागरिकाच्या शरीरात जाऊन तो त्याचं जीवितकार्य करू शकेल. त्या लामांनी त्या ब्रिटिश नागरिकाशीही संभाषण केलेलं असतं. त्यानुसार तो भारतात मुंबईला येतो आणि तिबेटच्या सीमेवर पोचतो. ल्हासामध्ये शत्रूसैन्य असल्यामुळे तो तिथे जाऊ शकत नाही; परंतु एका दुर्गम पहाडावरच्या मठामध्ये शरीरत्याग करतो. सूक्ष्म रूपात अन्य लामा त्याला सहकार्य करतात व बराच प्रयत्न केल्यावर तो ब्रिटिश नागरिकाच्या शरीरामध्ये शिरतो. तिथून मग त्याचं सुरुवातीला इंग्लंड, नंतर आयर्लंड आणि शेवटी कॅनडामध्ये नवीन आयुष्य सुरू होतं. अनेक छोटीमोठी कामं केल्यावर तो शेवटी लेखक बनतो. आणि ‘द थर्ड आय’ लिहून त्याची लेखन कारकीर्द सुरू होते!! परंतु त्याचं जीवितकार्य मानवतेच्या मुक्तीसाठी शरीराभोवतीच्या वलयांवर (ऑरा) संशोधन करून रोगनिदान करण्यामध्ये सहाय्य करेल, असे उपकरण विकसित करणे, हे असतं. त्याशिवाय पारंपारिक तिबेटी बौद्ध ज्ञानाची तो जगाला ओळख करून देतो. स्वत:च्या अनुभवाद्वारे आणि मिळालेल्या ज्ञानाद्वारे मानवजातीच्या इतिहासाची नव्याने ओळख करून देतो आणि एक प्रकारे पारंपारिक ज्ञानाला नष्ट होण्यापासून वाचवतो.........
समारोप
अशी ही तीन पुस्तकांची रोमहर्षक मालिका आणि असा हा दिव्य लोब्संग राम्पा! त्याने ह्या तीन आत्मचरित्रात्मक पुस्तकांनंतर वैचारिक अशी बरीच पुस्तकं लिहिली. जागतिक तत्त्वज्ञानात त्याने उत्पन्न केलेली लाट अजूनही शांत झालेली नाही....
लोब्संग राम्पाच्या लेखनाला आणि विचारांना नेहमीच कठोर टीका सहन करावी लागली. फेक, खोटारडा म्हणून खूप लोकांनी त्याला बघितलं. पण त्याच्या सांगण्यात अर्थ आहे, असे मानणारेही कमी नाहीत. पाश्चात्य विज्ञान व मानसिकतेबद्दल त्याची मतं कठोर आणि रोखठोक आहेत. पाश्चात्य मानसिकता कमालीची स्वार्थी, स्व- केंद्रित आणि दुस-यांचे शोषण करणारी आहे, असं तो सांगतो. पाश्चात्य मानसिकतेला प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेत आणून त्याचे तुकडे तुकडे करून सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचं निरीक्षण करेपर्यंत काहीही पटणार नाही, हे तो सांगतो. निव्वळ आसुरी इच्छा करण्याऐवजी पाश्चात्य मानसिकतेने जर थोडा विनम्रभाव आणि खुली मानसिकता ठेवली, तर त्यांचं भलं होईल, असं सांगायला तो कमी करत नाही.
ह्या तीनही पुस्तकांमध्ये निव्वळ आत्मकथन नाही. त्यामध्ये भरपूर विचारमंथन आहे, सोप्या उदाहरणांसह अनेक आध्यात्मिक साधना आणि प्रक्रियांचं वर्णन आहे. स्वदेशप्रेम आहे, पण अहंकार नाही. अत्यंत खळबळजनक काळात त्याने केलेल्या जगप्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर असंख्य महत्त्वाचे अनुभव व प्रसंग आहेत. वेगवेगळे देश, संस्कृती, राजवटी, माणसं ह्यांचं भावपूर्ण वर्णन आहे. शिवाय पुस्तकांची शैली निव्वळ तात्त्विक किंवा गंभीर नसून हलकी फुलकीसुद्धा आहे (पासपोर्ट घेऊन देश ओलांडताना/ देशात प्रवेश करताना मला लाल फितीमुळे जितक्या अडचणी आल्या, तितक्या अवैध प्रकारे देशांतर करताना कधीच आल्या नाहीत). जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लोब्संगने केलेला पराक्रम अविरत प्रकारे जाणवत राहतो. माणूस देवपदाला जरी पोचला असला, तरीही त्याला हाल अपेष्टांपासून मुक्ती नाही, जे सत्य जाणवतं आणि आपल्या चाकोरीबद्ध जीवनशैलीतल्या छोट्याश्या समस्यांच्या विरोधात थकणारे आपण दिसतो.....
आणखी महत्त्वाचं म्हणजे ह्या तीन पुस्तकांतून दिसणा-या तिबेटी बौद्ध पद्धतीचं व भारतीय योगपद्धतीतील साम्य. गुरू, कुंडलिनी, प्राण, आकाश, कर्म असे शब्द सहजपणे येतात. एकंदर तिबेटी तत्त्वज्ञानाची कार्यपद्धती पाहिली, तर त्यात ओळखीचं बरंच काही दिसतं. पद्मासनाने व कायास्थैर्यमने सुरुवात होते. ॐ आहे. ध्यान व योग तर आहेच. शिवाय कर्मसिद्धांत, जीवनविषयक दृष्टीकोनसुद्धा तोच आहे. त्यामुळे भारत किंवा अफगाणिस्तान, तिबेट, नेपाळ, चीन, ब्रह्मदेश, सयाम, थायलंड, कोरिया, श्रीलंका ही बौद्ध संस्कृती असलेली राष्ट्रे ह्यात फरक दिसतच नाही. शेवटी व्यापक सहिष्णू संस्कृती एकच आहे, समानच आहे, हे जाणवतं. फक्त इतकेच देश नाही, तर मानवजात एकच आहे, हे दिसतं. ह्यातल्या ब-याच गोष्टी चमत्कारिक, असंभाव्य वाटतील. पण तरीही ह्या पुस्तकांमध्ये आपण प्रत्यक्ष करू शकतो, अशा गोष्टींही मोठ्या प्रमाणात आहे. उदा., श्वासाचा वापर, विचारांवर नियंत्रण, शरीर सामर्थ्य ह्या संदर्भातील. त्यामुळे जरी आपल्याला काही मतं मान्य नसतील, तरीही मन मोकळं ठेवून ह्या पुस्तकांचा आस्वाद नक्की घेतला, नव्हे अभ्यास केला, तरी त्यातून भलंच होणार आहे.
संदर्भ
लोब्संग राम्पा ह्यांच्याबद्दल माहिती आणि त्यांची पुस्तकं इथून डाऊनलोड करता येतील.

द थर्ड आय
द थर्ड आय म्हणजेच मराठीत भाषांतरित झालेलं ‘तृतीय नेत्र’ हे लोब्संग राम्पा (१९११- १९८१) ह्यांचं पहिलं पुस्तक. पुस्तकाची सुरुवात चार वर्षाच्या लोब्संगपासून होते. चार वर्षांचा लोब्संग घोड्यावर बसायला शिकत असतो आणि त्सूबाबा ह्या शिक्षकाकडून स्वसंरक्षण-कला शिकत असतो. तिबेटी प्रथेप्रमाणे सातव्या वाढदिवशी लोब्संगचं भविष्य वर्तवलं जातं. त्याचं भविष्य उज्ज्वल असतं, तो महान पद प्राप्त करणार असतो; परंतु त्याचं आयुष्य संघर्षमय असतं आणि त्याच्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय असतं. त्यानंतर लगेचच तो ल्हासा जवळच्या चाकपोरी आश्रमात दाखल होतो. तिबेटमधील उच्च दर्जाच्या निवडक आश्रमांपैकी हा एक आश्रम. आश्रमात प्रवेश घेण्यापासून त्याची खडतर परीक्षा सुरू होते. तीन दिवस त्याला आश्रमाच्या बाहेर एका स्थितीत अजिबात हालचाल न करता बसावं लागतं. ही आश्रमाची चाचणी असते! आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण होतो. मग हळुहळु आश्रमाच्या पद्धती, गुरूजन, सहविद्यार्थी ह्यांची त्याला ओळख होते. त्याचे गुरू मिंग्यार डोंडूप लामाश्री त्याला घडवण्यास सुरुवात करतात. आधीपासून त्याची आध्यात्मिक उन्नती झालेली असल्यामुळे व ह्या जन्मात एका मोठ्या ध्येयाची पूर्तता हे त्याचं दायित्व असल्यामुळे त्याला इतरांपेक्षा खडतर प्रशिक्षण मिळतं. आश्रमातल्या कठोर वातावरणामध्ये तो पारंपारिक विद्यार्जन करतो.
एक वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याची योग्यता एका पातळीवर पोचते. भावी जीवनातील कार्य पूर्ण करण्यासाठी डोंडूप लामाश्री व अन्य गुरूजन मिळून त्याच्या कपाळावर विशेष अशी शस्त्रक्रिया करतात व त्याचा तृतीय नेत्र जागृत करतात. तिबेटी मान्यतेनुसार प्राचीन काळी मानवामध्ये आज असाधारण वाटणा-या अनेक शक्ती होत्या आणि प्रत्येकाजवळ तिसरा डोळाही होता; पण काळाच्या ओघात जसं मानवाचं स्खलन झालं, तशा ह्या शक्ती संपत गेल्या. फक्त काही पुण्यवान आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तीच त्या शक्तींसह जन्म घेऊ शकतात. आश्रमात लोब्संगचे जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणाबरोबरच त्याच्या आध्यात्मिक शक्तींना सक्रिय करण्यात येतं आणि म्हणूनच त्याचा तिसरा डोळा सुरू केला जातो. कपाळावरचं ऑपरेशन झाल्यावर काही दिवस त्याला आराम करावा लागतो. शस्त्रक्रियेचं वर्णन, इतर संदर्भ आणि तपशील (उदा., डोळे बंद असल्यामुळे त्याला अंधा-या खोलीत ठेवलं, काही दिवसानंतर एक मंद पणती लावली, रोज तिची वात थोडी थोडी मोठी करत नेली व हळुहळु डोळ्यांना उजेडाची सवय केली) मूळातून वाचण्यासारखे आणि अत्यंत विस्मयजनक आहेत. तिस-या डोळ्यामुळे त्याला माणसांचे विचार व शारीरिक स्थिती उत्तम प्रकारे दिसते. तिबेटी आध्यात्मात सांगितलेला ऑरा- वलय त्याला दिसतात. प्रत्येक माणसाच्या वलयाच्या रंगावरून आणि स्थितीवरून त्याची मन:स्थिती, विचार, शारीरिक स्थिती ह्या गोष्टी त्याला समजू लागतात. ह्या सर्व वर्णात तिबेटी आध्यात्मिक प्रगती, तिबेटी संस्कृती ह्यावर प्रकाश टाकला गेला आहे. आणि अनेक गोष्टी चमत्कारिक व विस्मयजनक असल्या तरी त्या सुसंबद्ध आहेत.
चाकपोरी आश्रमात डोंडूप लामाश्रींच्या हातांखाली लोब्संगचं प्रशिक्षण पुढेही सुरू राहतं. त्याला लामापद प्राप्त होतं. तिबेटी वैद्यकशास्त्र, शल्यक्रिया आदिमध्ये तो पारंगत होतो. आश्रमामध्ये दर वर्षी दुर्मिळ वनौषधींसाठीच्या सहलीचा एक कार्यक्रम असतो. त्यात तो भाग घेतो. दूरवरच्या आणि ल्हासापेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या प्रदेशात जाऊन तो वनौषधी आणण्याच्या मोहिमेत सहभागी होतो. तिबेटमधील पतंग उडवण्याच्या पद्धतीचंही वर्णन छान आहे. हे पतंग म्हणजे ग्लायडरसारखे मोठे असतात. त्यातून उंच डोंगरावर काही लोक थोडा वेळ हवाई भ्रमण करू शकतात. तिबेटी गुरूकुल पद्धती, आध्यात्मिक परंपरा, जीवनपद्धती ह्यांचं वर्णन सुंदर आहे.
ल्हासामधील तेरावे दलाई लामा डोंडूप लामाश्रींचे मित्र असतात आणि लोब्संगवरही त्यांचा जीव असतो. लोब्संगच्या तिस-या नेत्राचं काम इथे सुरू होतं. दलाई लामांना भेटायला विविध लोक- राजकीय पाहुणे येत असतात. ह्या पाहुण्यांचे उद्देश नक्की कसे आहेत, त्यांचे अंत:स्थ विचार काय आहेत, हे त्यांना लोब्संगकडून काढून घ्यायचं असतं. दलाई लामा लोब्संगवर प्रसन्न होतात. ल्हासाच्या पोताला आश्रमाचं वर्णन दिलं आहे. एकदा डोंडूप लामाश्री व लोब्संग आश्रमाच्या सर्वसामान्यांना प्रतिबंधित असलेल्या आणि फक्त उच्च लामांना खुल्या असलेल्या जमिनीखालच्या भागात जातात. तिबेटी परंपरेतील वैभवशाली वास्तु, पुरातन ग्रंथ, आध्यात्मिक साधनं इत्यादि तिथे असतात. आणखी गूढ अशाही ब-याच गोष्टी असतात.
त्यानंतर वनौषधी आणण्यासाठी तिबेटच्या एका अतिदुर्गम प्रदेशातील थरारक मोहिमेचं वर्णन दिलं आहे. तिबेटच्या उत्तर- पश्चिम भागामधील चांग- तांग ह्या पर्वतीय प्रदेशात डोंडूप लामाश्रींच्या नेतृत्वाखाली एक मोहिम जायला निघते. कित्येक महिने चालणा-या ह्या मोहिमेसाठी भरपूर सामग्री, घोडे, तट्टं इत्यादी तयारी केली जाते. तिबेटचा हा अतिदुर्गम भाग असतो. ल्हासा व आसपासच्या प्रदेशाची उंची ४००० ते ५००० मीटर आहे; पण चांग तांग ह्या उत्तर पश्चिम तिबेटमधील भागाची उंची ७००० ते ८००० मीटर असते आणि प्रवास पूर्णत: अशक्यप्राय असतो. बर्फाचे डोंगर, द-या, रस्त्यांचा अभाव, प्रतिकूल वातावरण, संपूर्ण निर्मनुष्य अशा सर्व परिस्थितीत मोहीम सुरू राहते. कित्येक साथीदार व घोडे आजारी पडतात. त्यांना वाटेतल्या एका शेवटच्या मुक्काम करण्यायोग्य ठिकाणी ठेवून उरलेले लोक पुढे जातात. खडतर प्रवास सुरूच राहतो. सर्व जण गळून जातात. सर्वांचे हाल होतात. तेव्हा कुठे चांग- तांग पर्वतीय प्रदेशात ते पोचतात. तिथलं हवामान सुखद व आल्हाददायक असतं. वनौषधींचा शोध घेता घेता त्यांना एक अतिप्राचीन नगरी सापडते. परत असाच खडतर प्रवास करत करत कित्येक महिन्यांनी ते मानवी प्रदेशात येतात. प्रवासाचे तपशील वाचण्यासारखे आहेत. वर्णन असामान्य असलं तरी अतिरंजित आणि अतिरेकी नाही. आपण नकाशात पाहिलं तर चांग तांग हा भाग आपल्याला तिबेटच्या वायव्य सीमेजवळ अक्साई चीनच्या दक्षिणेला आणि लदाखच्या पूर्वेला दिसतो........ अद्भुत...... असंच हे वर्णन आहे.
दहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर लोब्संगचं तिबेटमधलं शिक्षण पूर्ण होतं आणि वयाच्या अठराव्या वर्षी तो वरिष्ठ लामा होतो (सुमारे १९२९). जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक शिक्षणाची गरज असते; म्हणून तो तिबेट सोडतो. चीनच्या मध्यभागात असलेल्या चुंगकिंग (आजचे Chongqing) ह्या शहरात जाण्यासाठी तो निघतो. घर, आई- वडील ह्यांची त्याची आधीच ताटातूट झालेली असते. आणि तिबेटमध्ये आगामी येणा-या संकटांच्या संदर्भात भावी आयुष्यातल्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी चुंगकिंगला जायला निघताना लोब्संगची गुरूजी, आदरणीय दलाई लामा व मातृभूमी तिबेट ह्यांचीही ताटातूट होते आणि इथेच ‘द थर्ड आय’ हे पुस्तक समाप्त होतं.......................

डॉक्टर फ्रॉम ल्हासा
मराठीतलं तृतीय नेत्र वाचून झाल्यावर विलक्षण कुतूहल निर्माण झालं. इंटरनेटवर थोडं सर्च केलं आणि लगेच लोब्संग राम्पा ह्याच्या विषयी भरपूर माहिती मिळाली आणि त्याची पुस्तकंही डाऊनलोड करून वाचता आली! त्यामुळे लोब्संग राम्पाच्या जीवनयात्रेची महागाथा पुढे वाचता आली! डॉक्टर फ्रॉम ल्हासा हे त्यांचं दुसरं पुस्तक. ‘द थर्ड आय’ जिथे संपतं, तिथून हे पुस्तक सुरू होतं. निवडक साथीदार आणि तंदुरुस्त घोड्यांसोबत लोब्संगचा प्रवास चुंगकिंगच्या दिशेने सुरू होतो.... प्रवासवर्णन, जीवनशैली, तिबेटची माहिती ह्यांचं अत्यंत सुंदर मिश्रण ह्यात आहे. तिबेट हा अतिउंचीवरील प्रदेश. सरासरी उंची चार हजार मीटर आणि विलक्षण थंड हवामान. त्यामुळे जसे ते अतिउंचीवरून कमी उंचीच्या प्रदेशात येतात, तशा त्यांना अडचणी येतात. शरीराला कमी उंचीच्या वातावरणाची सवयच नसते. त्यामुळे उष्ण हवामान, जास्त घनतेची हवा ह्याचा त्यांना खूप त्रास होतो. तोपर्यंत चिनी संस्कृतीही सुरू झालेली असते. सर्व बदलांचा त्रास होतो. तरीही त्यांचा प्रवास सुरू राहतो. रात्री वाटेत लागणा-या एखाद्या मठात मुक्काम करत प्रवास सुरू राहतो. आणि हे मठ दलाई लामांच्याच परंपरेतलेच असे नसतात. परंतु कोणत्याही विचारधारेचा मठ असला, तरी यात्रेकरूंची व्यवस्था केली जाते! उष्ण प्रदेश, दमट हवामान, वादळी वारे ह्यांचा सामना करत करत ते पुढे जातात. एका टप्प्यावर आल्यावर त्यांना पक्का रस्ता लागतो आणि तिथून चार चाकांच्या वाहनांची वाहतुक सुरू होते! नवीन जगच सुरू होतं.
यांगत्सेच्या किनारी असलेलं चुंगकिंग हे तत्कालीन चीनमधलं एक मुख्य ज्ञानकेंद्र व बाजारपेठ असते. लोब्संग शहरी जीवन, काही प्रमाणात पाश्चात्य प्रभाव पहिल्यांदाच बघतो. तिथल्या एका वैद्यकशास्त्र महाविद्यालयात तो प्रवेश घेतो. त्याचे गुरूजी व दलाई लामांच्या ओळखीमुळे त्याची व्यवस्था होते. वैद्यक शास्त्रातलं त्याचं ज्ञान तपासलं जातं. त्याचं कठोर प्रशिक्षण व ज्ञान ह्यामुळे त्याचं ज्ञान अर्थातच भरपूर असतं. फक्त मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन विषय त्याला पूर्णपणे नवीन असतात! आणि इथेच गमती- जमती होतात! इलेक्ट्रिक करंट शिकवतानाच्या प्रात्यक्षिकामध्ये ‘करंट’ काय असतो, ह्याचं प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थ्यांना छोटा शॉक देऊन करंट म्हणजे काय, हे शिकवलं जातं. परंतु आध्यात्मिक साधनेमुळे लोब्संगला करंटची जाणीवच होत नाही (फक्त किंचित उष्णता जाणवते). काही तरी गडबड झाली, असं बघून शिक्षक जेव्हा स्वत: हात लावतात, तेव्हा त्यांना मात्र मोठा धक्का बसतो!! असंच मॅग्नेटिझमच्या प्रात्यक्षिकामध्ये होतं. लोब्संगला तिस-या डोळ्यामुळे चुंबकीय क्षेत्र दिसत असतं आणि हेच त्याच्या शिक्षकांना कोड्यात टाकतं. ह्या चिनी महाविद्यालयात अमेरिकन पद्धतीने वैद्यकशास्त्र शिकवलं जात असतं. तिबेटी पद्धत व पारंपारिक ज्ञान व अमेरिकन ज्ञान ह्यांच्यासंदर्भात वर्णन छान आहे. पाश्चात्य उथळ ज्ञानापेक्षा पौर्वात्य ज्ञानात जास्त शहाणपणा व खोली आहे, असं लोब्संगचं मत असतं. अनेकदा त्रास देणा-या आडदांड लोकांना लोब्संग मानेतली एक नस दाबून एका क्षणात लोळवतो. त्याचं आधुनिक वैद्यकशास्त्राचं शिक्षण सुरू राहतं.
योगायोगाने त्याची ओळख एका चिनी पायलटशी होते. हळुहळु उत्सुकतेपोटी तो त्यांच्याकडून विमान उडवण्याचं तंत्र शिकून घेतो आणि एकदा चक्क विमान उडवतो! त्याचं कौशल्य पाहून चैंग- कै- शेकचे लोक त्याला चिनी विमानदळात घेऊ इच्छितात. परंतु ह्यावेळीच अनेक दुर्घटनांना सुरुवात होते. चुंगकिंगमधले लोब्संगचे एक ओळखीचे लामा प्राणत्याग करतात. त्याचवेळी त्याला त्याचे गुरूजी- डोंडूप लामाश्री ह्यांनीही प्राणत्याग केल्याचं कळतं. तो न राहवून शोक करायला लागतो. त्याचा शोक पाहून डोंडूप लामाश्री सूक्ष्म देहाने येऊन त्याचं सांत्वन करतात आणि त्याला पुढच्या खडतर प्रसंगांना सामोरं जाण्यास सांगतात. त्यातून तो सावरला नसतानाच बातमी येते की आदरणीय दलाई लामा लवकरच शरीर सोडणार आहेत. त्याला आणि आणखी एका लामाला ल्हासाला येण्यासाठी मानसिक दूरसंवेदन- टेलिपॅथी पद्धतीने निरोप दिला जातो. एक वरिष्ठ लामा असूनही भावना आवरणं त्याला जड जातं. सत्वर तो ल्हासाला यायला निघतो. ह्यावेळी मात्र त्याच्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत (जिथे रस्ता जाऊ शकतो तिथपर्यंत!) एका मजबूत अमेरिकन गाडीची व्यवस्था केली जाते. ही गाडी दिवसरात्र प्रवास करून त्याला अर्ध्या वाटेवर रस्ता संपतो तिथे असलेल्या एका मठात आणून सोडते. ह्या मठातल्या मठाध्यक्षालासुद्धा टेलिपॅथी संदेश आलेला असल्यामुळे त्याने एक मजबूत घोडा लोब्संगसाठी तयार ठेवलेला असतो!
लोब्संग ल्हासामध्ये गुरूजी व आदरणीय दलाई लामांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहून आणि सहाध्यायी, मित्र आदिंचा अखेरचा निरोप घेतो. तिबेटी पद्धतीप्रमाणे दलाई लामांचा मृतदेह विशेष प्रकारे जतन करून पवित्र वास्तूत ठेवला जातो. विशेष म्हणजे त्यांचं मस्तक वारंवार पूर्वेकडे वळतं!! ह्याचं कारण म्हणजे पूर्वेकडून येणा-या (चिनी आक्रमणाच्या) संकटाबद्दल ते अखंड सावधानतेचा इशारा देत असतात. लोब्संग ल्हासाला अखेरचा रामराम करून तो चुंगकिंगच्या दिशेने घोड्यावरून सुसाट निघतो. मुक्कामाच्या मठामध्ये नवीन घोडा घेऊन तो न थांबता प्रवास करतो. परत त्याला तीच मजबूत गाडी मिळते आणि अखेरिस तो चुंगकिंगला येऊन पोचतो.
त्या वेळी चुंगकिंगमध्ये हळुहळु जपानी आक्रमणाच्या बातम्या येत असतात. अनेक भागांमध्ये जपानी कारवाया सुरू झालेल्या असतात. त्याला चैंग-कै शेकच्या अधिका-यांचा निरोप मिळतो. तो चिनी विमानदलात एक वैद्यकीय अधिकारी म्हणून दाखल होतो! आक्रमणाच्या तणावामुळे शांघायजवळ परिस्थिती बिघडत असते व तिथल्या वैद्यकीय सेवेसाठी तो शांघायला येतो. काही काळाने म्हणजे ७ जुलै १९३७ रोजी मार्को पोलो पूल ओलांडून जपानी सेना शांघायवर हल्ला करते. ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’मधला इथून पुढचा भाग म्हणजे खरीखुरी युद्धकथाच आहे. विपरित परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही साधनांशिवाय रुग्णसेवा करत असताना जपानी लोक लोब्संगला पकडतात. त्याचे असंख्य हाल करतात. त्याने प्रश्नांची उत्तरं द्यावीत म्हणून अत्यंत क्रूर हाल करतात. उलटे टांगून हात गळ्याशी बांधणे, नखं कापून त्यात मीठ चोळणे, उपाशी ठेवणे, आगीवर टांगून ठेवणे आणि असंख्य. कित्येक दिवस, आठवडे व महिने ते त्याचा छळ करतात, पण तो “मी चिनी सेनेत अधिकारी आहे व युद्धकैदी आहे,” ह्याव्यतिरिक्त काहीच सांगत नाही. प्रचंड अत्याचार सहन केल्यानंतर तो कसाबसा तुरुंगवासातून मृतदेहाचं सोंग घेऊन निसटतो आणि एका वृद्ध चिनी माणसाच्या मदतीने परत चैंग- कै- शेकच्या चिनी सैन्याला मिळतो. काही दिवस चुंगकिंगमध्ये राहतो. त्यावेळी चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चुंगकिंगचीही रया गेलेली असते. तिथेही हल्ले सुरू झालेले असतात. थोडा आराम करून व जुन्या लोकांना भेटून तो परत युद्धभूमीवर येतो. रुग्णसेवा करत असतानाच परत पकडला जातो. पुन: भयानक छळ आणि हाल. परत एकदा तो निसटतो आणि एका युरोपीयन व्यक्तीच्या घरी जातो. पण तो जपानी लोकांना सामील झालेला असल्यामुळे लोब्संग परत एकदा जपानी लोकांच्या तावडीत सापडतो. सर्वत्र जपानच्या विजयाच्या बातम्या येत असतात.
लोब्संग माहिती देत नसल्यामुळे ते त्याचा अविरत छळ करतात. पण कठोर परिश्रम आणि आध्यात्मिक प्रगतीच्या बळावर लोब्संग टिकाव धरतो. छळामुळे होणा-या वेदनांचा सामना करण्यासाठी त्याला वेदनांवरून मनाचं ध्यान दूर न्यायचं असतं. त्यासाठी तो जुन्या आठवणी, गुरूंचे उपदेश व गतकालीन प्रसंग आठवतो. चांग- तांग पर्वतीय प्रदेशातील त्यांचा प्रवास, प्राचीन नगरी, तिथली उपकरणे, तिथे दिसलेले यती इत्यादी त्याला आठवतात. मधून मधून गुरू सूक्ष्म रूपाने येऊन त्याला प्रेरणा देतात. शेवटी त्याला एका महिला कैद्यांच्या कँपचा डॉक्टर म्हणून काम देतात. त्या भागात मिळणा-या वनस्पतींचा वापर कुशलतेने करून तो ट्रॉपिकल अल्सरसारख्या भितीदायक रोगावर औषधोपचार तयार करतो. कैद्यांना गोळा करून साधनं तयार करतो. श्वासाचा परिणामकारक वापर करून वेदना कशा कमी जाणवतील, ह्यासाठी कैद्यांना प्रशिक्षण देतो. परंतु काही दिवसांतच त्याला पुन: बंदी करून जपानमधल्या तुरुंगात आणलं जातं. शांघायहून जवळजवळ एक मृतदेह म्हणून जपानच्या मुख्यभूमीपर्यंतच्या प्रवासाचं केलेलं वर्णन थरारक आणि भीषण आहे. युद्ध आणि साम्राज्यवाद असेल, तर नाव कोणतंही असो, वास्तव सैतानाचा साक्षात्कार, हेच असतं हे दिसतं.....
जपानच्या मुख्यभुमीतील हिरोशिमाजवळच्या एका बंदिवासात लोब्संगला ठेवण्यात येतं. सततच्या छळामुळे व शरिरावर झालेल्या असंख्य आघातांमुळे तो अत्यंत अशक्त असतो आणि कित्येक दिवस पडून असतं. त्याचं स्थळ- काळाचं भान शिल्लक राहात नाही. फक्त ह्या तुरुंगात समुद्रातून कोणत्या मार्गाने आलो, तितकं त्याला लक्षात असतं. लोब्संग कमालीचा अशक्त असतो. अशक्त लोब्संगच्या सूक्ष्म देहाला उच्च लोकामध्ये बोलावलं जातं. तिथे लोब्संगला त्याचे गुरुजी व अन्य लामा भेटतात. ते त्याला सांगतात, “तू अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून जात आहेस. तुझ्या कष्टांना व हाल- अपेष्टांना मर्यादा नाहीत. तुझं शरीर खिळखिळं झालं आहे. आम्ही तुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही असा एक ब्रिटिश नागरिक बघितला आहे, जो प्राणत्याग करू इच्छितो. त्याचं शरीर तुला मिळू शकतं. पण अजून त्यासाठी सात वर्षं बाकी आहेत. तुला हर हवं असेल, तर तू शरीर सोडून आमच्यात येऊ शकतो; तुला कोणीही नाव ठेवणार नाही.” त्यावर लोब्संग त्याच्या विशेष ध्येयासाठी झुंजत राहण्याची इच्छा व त्याचा निर्धार बोलून दाखवतो. सूक्ष्म देह परत त्याच्या शरिरात येतो आणि त्याचा तुरुंगवास सुरू राहतो.
एके दिवशी लोब्संगला विमानाची घरघर ऐकू येते. त्याला माहिती असलेल्या विमानांपेक्षा ती वेगळी असते. तेवढ्यात बाहेर सर्वत्र हल्लकल्लोळ उठतो आणि सैनिक आरडाओरड सुरू करतात. सर्वत्र एकच थैमान सुरू होतं. “सम्राट, आम्हांला ह्या प्रलयापासून वाचवा,” असं सैनिक म्हणत असतात. लोब्संगने लिहिलं आहे, की तो हिरोशिमावरचा ६ ऑगस्ट १९४५ चा अणुबाँब होता आणि अर्थातच हे त्याला त्या वेळी समजलं नाही.. लोब्संगला जाणवतं की सर्व सैनिक प्रचंड भितीने पळत आहेत आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. तो इतका अशक्त असतो, की त्याच्या खोलीला कुलुपही नसतं. तो हळुच बाहेर पडतो. एका सैनिकाचे बूट व पोशाख घेऊन खुरडत खुरडत समुद्राच्या दिशेने पुढे जायला निघतो. कसा बसा तो किना-यावर पोचतो. सर्वत्र अराजकता असते, त्यामुळे त्याला कोणी अडवत नाही. वाळूत त्याला एक नाव दिसते. शक्ती एकवटून तो नावेपर्यंत जातो. त्यात त्याला काही मासे अन्न म्हणून ठेवलेले दिसतात. तो थोडेसे खातो आणि खूप जोर लावून नावेचा दोर तोडतो. नाव मोकळी होते आणि हळुहळु समुद्रात जाते......... असंख्य मरणयातना आणि अत्याचार सहन केल्यावर कित्येक वर्षांच्या तुरुंगवासातून तो मुक्त होतो........ आणि तिथेच ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’ भाग संपतो.

द राम्पा स्टोरी
आत्मचरित्राच्या ह्या तिस-या भागाच्या सुरुवातीला वर्तमानकाळातील काही संवाद आहेत. पण ते समोरासमोरचे किंवा दूरध्वनीवरचे नाहीत; तर सूक्ष्म रूपातील आहेत!! पहिले दोन भाग प्रकाशित झाल्यावर लोब्संगवर काही लोकांनी खूप टीका केलेली असते. खोटं आणि काल्पनिक लेखन असं त्याच्या लेखनाबद्दल बोललं जात असतं. त्याला त्याचे गुरूजी व अन्य लामा समजावून सांगतात, की त्याने लिहिणं खूप आवश्यक आहे. जे लोक आध्यात्मिक प्रवासात थोड्या तरी विकसित अवस्थेत आहेत, ते त्याचं सांगणं समजू शकतील. आणि इतरांनी जरी त्याच्या सांगण्याला खोटं म्हंटलं, तरी त्यांच्या अंतर्मनात त्याची नोंद होईल व योग्यवेळी त्यांनाही त्याची जाणीव होईल. म्हणून ते त्याला लिहिण्यास प्रेरित करतात. आधीच्या भागांकडे एक दृष्टीक्षेप टाकल्यावर आत्मचरित्र परत हिरोशिमामध्ये व तिथून बाहेर पडणा-या नावेच्या प्रवासाकडे येतं.....
कितीतरी दिवस, आठवडे, महिने लोब्संगची नाव समुद्रात जात राहते. त्याला स्थळ- काळाचं भान उरत नाही. नावेतले मासे आणि पावसाचं पाणी ह्यावर मधून मधून जागा होणारा लोब्संग पुढे पुढे जात राहतो....... कित्येक काळ उलटल्यावर त्याच्या कानावर काही शब्द ऐकू येतात. त्याची नाव किना-याला लागलेली असते आणि दोन तरुण किना-यावरून त्याच्याकडे येतात. ते त्याला ढकलून नाव स्वत:च्या ताब्यात घेतात. लोब्संग किना-यावर वाळूत बेशुद्ध पडलेला असतो.
शुद्धीवर आल्यावर लोब्संगला त्याला एका जागी आडवं केल्याचं दिसतं. त्याच्याजवळ पाणी व थोडं अन्न ठेवलेलं असतं. तो एका मठात असतो. त्याचे उघडलेले डोळे पाहून एक वृद्ध बौद्ध भिक्षु त्याच्याकडे येतात. दोघांची भाषा चिनी असली तरी त्यात बराच फरक असतो; पण हळुहळु संवाद सुरू होतो. ते भिक्षु त्याला सांगतात की ते वाळूत त्याला बघून शिष्यांना सांगून मठात आणतात. ते हेही सांगतात, की त्यांच्या मठात एक दिवस कोणी विशेष अतिथी येणार आहे, अशी त्यांना पूर्वीपासून सूचना देण्यात आली होती व केवळ त्या कारणासाठी ते वयोवृद्ध भिक्षु शेवटचा श्वास घेत जगत असतात. काही दिवस लोब्संग तिथे विश्रांती घेतो. परंतु नंतर ते भिक्षु त्याला समजावतात की त्याने फार काळ थांबून चालणार नाही, कारण धोका अजून संपलेला नाही आणि भिक्षुही राहणार नाहीत. तो मठ उत्तर कोरियामध्ये असतो (अर्थातच लोब्संगची नाव जपानच्या दक्षिण- पश्चिमेकडून समुद्र ओलांडून उत्तर कोरियाला लागलेली असते!!!). भिक्षुंचे शिष्य त्याला उनगीचा रस्ता सांगतात. उनगी उत्तर कोरियामध्ये रशियन सीमेपासून जवळ असतं (गावाचं आजचं नाव सोन्बोंग आहे आणि ते उत्तर कोरियामध्ये चीन व रशिया ह्यांच्या सीमेलगत आहे). मुख्य रस्त्यावरून न जाता बाजूने चालत चालत तो तिथपर्यंत जातो. चिनी आणि जपानी भाषेत लोकांना विचारत विचारत आणि थांबत थांबत जातो. उनगीमध्ये पोचल्यावर त्याला व्हॅलिडिओस्टॉककडे जायचं असतं. त्याला रशियन लाल फ्रंटियर पेट्रोलचे तीन सैनिक दिसतात. त्यांच्याजवळ पोलिसी कुत्रे असतात. त्याला बघून ते कुत्रे त्याच्यावर धावून येतात.... लोब्संग मनामध्ये त्या कुत्र्यांप्रति सद्भाव व्यक्त करून तो त्यांचा मित्र आहे, असा विचार व्यक्त करतो. कुत्रे त्याच्या अंगापर्यंत येऊन शांत होतात. सैनिकांना प्रचंड आश्चर्य वाटतं. ज्या अर्थी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला नाही, त्या अर्थी तो स्थानिक धर्मगुरू असावा, असं त्यांना वाटतं. ते प्रभावित होऊन त्याची मदत करतात. त्याला त्यांच्या गाडीतून व्हॅलिडिओस्टॉकलाही न्यायला तयार होतात.
व्हॅलिडिओस्टॉकमधल्या छावणीमध्ये पोलिसी कुत्र्यांनी वेगळीच समस्या निर्माण केलेली असते. कारण कम्युनिस्ट लाल सोव्हिएत राजवटीमध्ये सैनिक त्या कुत्र्यांना सतत बंडखोरांवर सोडत असतात व त्यामुळे मानवी रक्ताची चटक लागून ते कुत्रे नियंत्रणाबाहेर जात असतात. कुत्र्यांच्या एका दंगलीमध्ये 4 सैनिकसुद्धा ठार झालेले असतात. म्हणून हे सैनिक (त्यातला एक सार्जंट असतो) लोब्संगला कुत्र्यांना नियंत्रणात आणायला सांगतात. तो आणून दाखवतो. मग आणखी कुत्र्यांना नियंत्रणात आणण्याचा ‘पराक्रम’ लोब्संग करतो. त्याच्यामुळे तिथला वरिष्ठ अधिकारी इतका प्रभावित होतो, की त्याला लाल सोव्हिएत सेनेत तो त्याला मानाचं कॉर्पोरेल पद देतो! काही दिवस कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी ते लोब्संगला थांबवून घेतात, पैसे आणि इतर साधनं देतात. लोब्संग त्यांच्याकडून व्हॅलिडिओस्टॉकमधून मॉस्कोला जाणा-या ट्रान्स सैबेरियन रेल्वेच्या प्रवासाची माहिती काढून घेतो. सुरक्षा रक्षकांना चुकवत तो प्रवास कसा करता येईल, हे त्याच्या लक्षात येतं.......
तिथून पुढे त्याचा अखंड प्रवास सुरू होतो...... प्रवास, छळ आणि परत प्रवास. व्हॅलिडिओस्टॉकच्या पुढच्या एका गावात तो मॉस्कोला जाणा-या मालगाडीमध्ये बसतो. पुढे काही दिवसांनी बैकल सरोवराजवळ ती गाडी थांबते. तपासणीच्या वेळी तो ट्रेनमध्ये उतरून मग परत डब्यात चढतो. पण ह्यावेळी डब्यात अजून चार जण असतात. ते त्याच्यावर हल्ला करतात. पण तिबेटी युद्धकौशल्याने लोब्संग त्यांना लगेचच शांत करतो. मग ते त्याला सहकार्य करतात. मालगाडीमध्ये खायला धान्य व पदार्थ मिळतात. सैबेरियातल्या बर्फापासून पाणी मिळतं. निघाल्यापासून जवळजवळ चोवीस दिवसांनी लोब्संग मॉस्कोजवळ पोचतो. तिथून परत प्रवास, कैद, छळ, सुटका, प्रवास असं किती तरी महिने किंवा वर्षं सुरू राहतं. अखेरीस तो युक्रेन- पोलंडमार्गे चेकोस्लोव्हाकियामध्ये पोचतो (दुस-या महायुद्धातल्या जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण युद्धक्षेत्रातून जाऊन!). तिथून मग त्याचा छळ थोडा थोडा कमी होतो. परंतु पाश्चात्य जगातील पद्धती माहित नसल्यामुळे लोक त्याला फसवत राहतात. तरीही स्वत:च्या हुशारीवर असंख्य उद्योग करत तो चेकोस्लोव्हाकिया, इटली, जर्मनी, फ्रांसमार्गे अमेरिकेत पोचतो. ह्या सर्व प्रवासात ड्रायव्हर, इंजिनिअर, मर्चंट नेव्ही इंजिनिअर, रेडिओ निवेदक अशी कित्येक कामं तो करतो.
मधल्या कालावधीत तिबेटमध्ये चीनच्या लाल सेनेने आक्रमण करून तो देश गिळंकृत केलेला असतो (१९५०). सर्वत्र पारतंत्र्य आणि जुलुमशाही आलेली असते. ल्हासामधले मठ जाऊन तिथे नवीन कामगारगृहे येतात. सूक्ष्म रूपात लोब्संग हे पाहतो. सूक्ष्म रूपात त्याचं त्याच्या गुरुजींशी संभाषण होतं. ते त्याला सांगतात, की त्याच्या शरीराचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्याने आता तिबेटमध्ये जाऊन आत्मार्पण करावं, म्हणजे त्याचं शरीर पारंपारिक पद्धतीने जतन करता येईल आणि एका ब्रिटिश नागरिकाच्या शरीरात जाऊन तो त्याचं जीवितकार्य करू शकेल. त्या लामांनी त्या ब्रिटिश नागरिकाशीही संभाषण केलेलं असतं. त्यानुसार तो भारतात मुंबईला येतो आणि तिबेटच्या सीमेवर पोचतो. ल्हासामध्ये शत्रूसैन्य असल्यामुळे तो तिथे जाऊ शकत नाही; परंतु एका दुर्गम पहाडावरच्या मठामध्ये शरीरत्याग करतो. सूक्ष्म रूपात अन्य लामा त्याला सहकार्य करतात व बराच प्रयत्न केल्यावर तो ब्रिटिश नागरिकाच्या शरीरामध्ये शिरतो. तिथून मग त्याचं सुरुवातीला इंग्लंड, नंतर आयर्लंड आणि शेवटी कॅनडामध्ये नवीन आयुष्य सुरू होतं. अनेक छोटीमोठी कामं केल्यावर तो शेवटी लेखक बनतो. आणि ‘द थर्ड आय’ लिहून त्याची लेखन कारकीर्द सुरू होते!! परंतु त्याचं जीवितकार्य मानवतेच्या मुक्तीसाठी शरीराभोवतीच्या वलयांवर (ऑरा) संशोधन करून रोगनिदान करण्यामध्ये सहाय्य करेल, असे उपकरण विकसित करणे, हे असतं. त्याशिवाय पारंपारिक तिबेटी बौद्ध ज्ञानाची तो जगाला ओळख करून देतो. स्वत:च्या अनुभवाद्वारे आणि मिळालेल्या ज्ञानाद्वारे मानवजातीच्या इतिहासाची नव्याने ओळख करून देतो आणि एक प्रकारे पारंपारिक ज्ञानाला नष्ट होण्यापासून वाचवतो.........
समारोप
अशी ही तीन पुस्तकांची रोमहर्षक मालिका आणि असा हा दिव्य लोब्संग राम्पा! त्याने ह्या तीन आत्मचरित्रात्मक पुस्तकांनंतर वैचारिक अशी बरीच पुस्तकं लिहिली. जागतिक तत्त्वज्ञानात त्याने उत्पन्न केलेली लाट अजूनही शांत झालेली नाही....
लोब्संग राम्पाच्या लेखनाला आणि विचारांना नेहमीच कठोर टीका सहन करावी लागली. फेक, खोटारडा म्हणून खूप लोकांनी त्याला बघितलं. पण त्याच्या सांगण्यात अर्थ आहे, असे मानणारेही कमी नाहीत. पाश्चात्य विज्ञान व मानसिकतेबद्दल त्याची मतं कठोर आणि रोखठोक आहेत. पाश्चात्य मानसिकता कमालीची स्वार्थी, स्व- केंद्रित आणि दुस-यांचे शोषण करणारी आहे, असं तो सांगतो. पाश्चात्य मानसिकतेला प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेत आणून त्याचे तुकडे तुकडे करून सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचं निरीक्षण करेपर्यंत काहीही पटणार नाही, हे तो सांगतो. निव्वळ आसुरी इच्छा करण्याऐवजी पाश्चात्य मानसिकतेने जर थोडा विनम्रभाव आणि खुली मानसिकता ठेवली, तर त्यांचं भलं होईल, असं सांगायला तो कमी करत नाही.
ह्या तीनही पुस्तकांमध्ये निव्वळ आत्मकथन नाही. त्यामध्ये भरपूर विचारमंथन आहे, सोप्या उदाहरणांसह अनेक आध्यात्मिक साधना आणि प्रक्रियांचं वर्णन आहे. स्वदेशप्रेम आहे, पण अहंकार नाही. अत्यंत खळबळजनक काळात त्याने केलेल्या जगप्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर असंख्य महत्त्वाचे अनुभव व प्रसंग आहेत. वेगवेगळे देश, संस्कृती, राजवटी, माणसं ह्यांचं भावपूर्ण वर्णन आहे. शिवाय पुस्तकांची शैली निव्वळ तात्त्विक किंवा गंभीर नसून हलकी फुलकीसुद्धा आहे (पासपोर्ट घेऊन देश ओलांडताना/ देशात प्रवेश करताना मला लाल फितीमुळे जितक्या अडचणी आल्या, तितक्या अवैध प्रकारे देशांतर करताना कधीच आल्या नाहीत). जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लोब्संगने केलेला पराक्रम अविरत प्रकारे जाणवत राहतो. माणूस देवपदाला जरी पोचला असला, तरीही त्याला हाल अपेष्टांपासून मुक्ती नाही, जे सत्य जाणवतं आणि आपल्या चाकोरीबद्ध जीवनशैलीतल्या छोट्याश्या समस्यांच्या विरोधात थकणारे आपण दिसतो.....
आणखी महत्त्वाचं म्हणजे ह्या तीन पुस्तकांतून दिसणा-या तिबेटी बौद्ध पद्धतीचं व भारतीय योगपद्धतीतील साम्य. गुरू, कुंडलिनी, प्राण, आकाश, कर्म असे शब्द सहजपणे येतात. एकंदर तिबेटी तत्त्वज्ञानाची कार्यपद्धती पाहिली, तर त्यात ओळखीचं बरंच काही दिसतं. पद्मासनाने व कायास्थैर्यमने सुरुवात होते. ॐ आहे. ध्यान व योग तर आहेच. शिवाय कर्मसिद्धांत, जीवनविषयक दृष्टीकोनसुद्धा तोच आहे. त्यामुळे भारत किंवा अफगाणिस्तान, तिबेट, नेपाळ, चीन, ब्रह्मदेश, सयाम, थायलंड, कोरिया, श्रीलंका ही बौद्ध संस्कृती असलेली राष्ट्रे ह्यात फरक दिसतच नाही. शेवटी व्यापक सहिष्णू संस्कृती एकच आहे, समानच आहे, हे जाणवतं. फक्त इतकेच देश नाही, तर मानवजात एकच आहे, हे दिसतं. ह्यातल्या ब-याच गोष्टी चमत्कारिक, असंभाव्य वाटतील. पण तरीही ह्या पुस्तकांमध्ये आपण प्रत्यक्ष करू शकतो, अशा गोष्टींही मोठ्या प्रमाणात आहे. उदा., श्वासाचा वापर, विचारांवर नियंत्रण, शरीर सामर्थ्य ह्या संदर्भातील. त्यामुळे जरी आपल्याला काही मतं मान्य नसतील, तरीही मन मोकळं ठेवून ह्या पुस्तकांचा आस्वाद नक्की घेतला, नव्हे अभ्यास केला, तरी त्यातून भलंच होणार आहे.
संदर्भ
लोब्संग राम्पा ह्यांच्याबद्दल माहिती आणि त्यांची पुस्तकं इथून डाऊनलोड करता येतील.
Monday, October 24, 2011
लदाखची भ्रमणगाथा: भाग ६
लेहदर्शन
सोनामार्गसह काश्मीरमध्ये ब-याच ठिकाणी हिमवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर आणि काश्मीरच्या चार जिल्ह्यांमधून ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट’ मागे घेण्याचा प्रस्ताव बनवण्यात आल्यानंतर भ्रमणगाथेतील पुढचं वर्णन लिहितोय...
११ ऑगस्टच्या सकाळी करगिलमधून निघून संध्याकाळी सहाच्या सुमारास लेहमध्ये पोचलो....... अभूतपूर्व अनुभव...... शब्दातीत.... लेह!! लदाख विभागाचं मुख्यालय. काश्मीरमधलं एक आगळं वेगळं शहर. सर्वच दृष्टीने एकमेव. शहर आहे, पण मोठं नाही. अत्यंत दुर्गम भागात असलं तरी आधुनिक आहे. उंची ३५०५ मीटर्स, फक्त.
लेह व एकूणच लदाख प्रदेशात हिवाळ्यामध्ये तपमान शून्यच्या खूप खाली जातं. द्रासमध्ये ते -६० अंशे से. इतकं कमी होतं, तर लेहमध्ये -२० पर्यंत जातं. त्यामुळे इथली जीवनशैली त्यानुसार घडली आहे. घरं त्यामुळेच जास्त जाड होती; भिंती, दरवाजे जास्त भक्कम होते. पर्यटकांचा अखंड ओघ असूनही अद्याप लेह साधं व आटोपशीर वाटत होतं. आकारानेसुद्धा लहानच आहे. पार्श्वभूमी व काही गोष्टी सोडल्या तर इतर शहरांसारखंच. बरीच नावं तिबेटी लिपीमध्ये दिसत होती. ही लिपी थोडीशी बंगाली लिपीच्या वळणाची आहे. कित्येक वाहनांचे क्रमांकसुद्धा तिबेटी लिपीत दिसत होते. पर्यटनाच्या उद्योगामुळे जेवण- हॉटेल, राहण्याची सोय इत्यादि बाबी इतरत्र आहेत, तशाच इथेही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे राहण्या- खाण्याचे हाल होत नाहीत.
लेह एका दुर्गम परिसराचा मध्यबिंदु आहे. खाजगी वाहनाव्यतिरिक्त प्रवासाच्या इतर सोयी जवळजवळ नगण्यच आहेत. काही बस उन्हाळ्यात श्रीनगर व मनालीच्या दिशेने जातात; पण त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे खाजगी वाहनचालक, प्रवासी एजंट ह्यांनाच जास्त प्राधान्य दिलं जातं. लेह शहरामध्ये शहर बससेवा असल्याचं समजलं. परंतु तरीही, सामान्य माणसासाठी इथला प्रवास अवघडच आहे. सर्वच परिसर दुर्गम आहे व त्यामुळे एकंदरीत जीवनशैली व राहणीमानसुद्धा काहीसं अवघड होतं. अन्य भागांना उपलब्ध असलेले पर्याय इथे उपलब्ध होत नाहीत.
तरीसुद्धा पर्यटकांसाठी खूप सोयी निर्माण झालेल्या आहेत. लेहमध्ये इंटरनेट कॅफे मिळाल्यामुळे बरं वाटलं. अर्थात हा सर्व परिसर, लदाखचं विश्व असं होतं, ज्यामध्ये इंटरनेट ह्या साधनाचाच काय, सर्व मानवनिर्मित गोष्टींचा विसर पडावा.......
संध्याकाळी लेहमध्ये काहीशी थंडी जाणवत होती. जशी महाराष्ट्रातल्या गावांमध्ये हिवाळ्यामध्ये अनुभवता येते. आल्हाददायक थंडी होती. श्वास घेताना व हालचाल करताना किंचित त्रास जाणवत होता; अर्थात काळजी वाटावी इतका तो जास्त नव्हता. संध्याकाळी वेळ मिळाल्यामुळे थोडं फार फिरलो; ज्यामुळे शरीराला त्या वातावरणाची थोडी ओळख झाली. अशी ओळख होणं गरजेचं आहे. आणि तशी द्रासच्या पुढे आल्यापासूनच ओळख होत होती. त्यामुळे शरीर कशी प्रतिक्रिया देईल, ही भिती कमी होत गेली.... लेहमध्ये ठीक होतं, पण पुढे शरीर चांगली प्रतिक्रिया देणार होतं.......
हसनजी व मोहम्मद हुसेनजींच्या रूपाने आम्हांला अत्यंत चांगले लोक मिळाल्यामुळे सर्व व्यवस्था उत्तम होती. कुठे फिरावं, कसं, कधी, काय बघण्यासारखं आहे, इत्यादिबद्दल आम्हांला आमचे ट्रॅव्हल एजंट योग्य मार्गदर्शन करत होते. रात्री दुस-या दिवशीचा कार्यक्रम ठरला. दुस-या दिवशी आम्ही लेह परिसरातील गोम्पा, राजवाडे, सिंधू घाट इत्यादि पाहणार होतो. त्यानंतर मग लदाखमधील लेहपासून दूर असलेल्या भागांमध्ये जाणार होतो. लेह आसपासच्या भेटीसाठी इनर लाईन परमिट लागत नाही; पण अन्यत्र जवळजवळ सगळीकडेच तो लागतो. आम्ही लेहच्या आसपास फिरत असताना हसनजी आमच्यासाठी पेंगाँग त्सो, नुब्रा खोरे आणि त्सो मोरिरीचा परमिट काढून ठेवणार होते.
आलो तेव्हा संध्याकाळी पडत असलेला पाऊस कमी होता; पण रात्रीसुद्धा पडतच होता. अर्थात तो फार काळजी करण्यासारखा नव्हता. हलकासा छिडकावा होता आणि ढग मोठ्या प्रमाणात पसरले होते...... लेह......
सकाळी पर्वतांवर दिसणारे कोवळे सूर्यकिरण
सकाळी दिसणारं लेहमधील नितळ आकाश...
सकाळी नितळ आकाश म्हणजे वस्तुत: काय असतं हे बघायला मिळालं. खरा निळा रंग. अत्यंत स्वच्छ, शांत, आल्हाददायक निळं आकाश...... सकाळी १० च्या सुमारास निघालो. जवळपासच्या भागातच जायचं असल्यामुळे फार घाई नव्हती.
लेह ही नामग्याल ह्या लदाखच्या पारंपारिक राजघराण्याची राजधानी. त्यामुळे राजवाडा लेहच्या जवळच होता. आम्ही लेहमधून निघून कारूच्या रस्त्याला लागलो. दक्षिण- पूर्वेकडे जाणारा हा रस्ता. हाच रस्ता लेह- मनाली महामार्ग आहे. १९८९ मध्ये लेह- मनाली महामार्ग वाहतुकीला खुला होईपर्यंत लेहला जोडणारा लेह- करगिल- श्रीनगर हाच मुख्य मार्ग होता. कारूपर्यंतचा रस्ता सपाट असल्यामुळे छान आहे. लेहच्या थोडं बाहेर पडलं की लगेचच सिंधू नदी व मग सिंधू घाट लागतो. आम्ही परत येताना तिथे थांबणार होतो.
झाडी निसर्गत: आलेली नसून जाणीवपूर्वक लावली असल्याचं लगेच जाणवतं.
लेहमधून निघाल्यानंतर शे राजवाडा व ठिकसे गोम्पा बघितले. ह्या प्राचीन वास्तु आहेत. चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. त्यावेळी तिथे विदेशी पर्यटक भरपूर होते. महाराष्ट्रीय पर्यटकांचेही काही गट दिसत होते. काही केसरीसारख्या पर्यटन संस्थेकडून आले होते; तर काही व्यक्तीगतरित्या एकत्र येऊन फिरत होते.
बाहेरून दिसणारी ठिकसे गोम्पा
गोम्पामधील प्राचीन वारसा
इतर काहीही असलं तरी विदेशी पर्यटकांमध्ये उत्साहसुद्धा भरपूर असतो....
बुद्धभूमीतील बुद्धमूर्ती
शे राजवाडा आणि ठिकसे गोम्पा ह्या वास्तु आधी बघितलेल्या लामायुरूतील गोम्पाप्रमाणे काहीशा वाटत होत्या. शे राजवाडा अत्यंत भव्य आहे. ठिकसे गोम्पा तर ब-याच उंचीवर म्हणजे एका टेकडीवर आहे. त्यामुळे टेकडी चढून ठिकसे गोम्पाच्या उंबरठ्यावर पोचतानाच दमछाक झाली. थांबत थांबत जाऊनसुद्धा. त्यामुळे मग आतमध्ये फार फिरून पाहता आलं नाही. आमच्यातला गिरीश मात्र सर्व गोष्टी बारकाईने बघत होता. संपूर्ण प्रवासामध्ये मी व परीक्षित ह्यांच्या तब्येतीचा कस लागला; पण गिरीशला मात्र कुठेही त्रास झाला नाही. जणू कोणत्याही पिचवर दमदार खेळ करणा-या कसलेल्या
फलंदाजाप्रमाणे त्याने लगेचच लदाखच्या पिचसोबत जुळवून घेतलं.
हे आणि लदाखमधल्या इतर सर्व गोष्टी बघताना माझ्यामध्ये फोटो घेण्याचं भान उरतच नव्हतं. नजारा किंवा समोरचं अद्भुत विश्व इतकं विलक्षण होतं, की इतर कशाचच भान राहू शकत नव्हतं. परंतु ह्याही परिस्थितीमध्ये माझ्या मित्रवर्यांनी- गिरीश आणि परीक्षितने फोटो घेण्याचं महान काम पूर्ण केलं व त्यामुळेच हा ब्लॉग ख-या अर्थाने साकार होतो आहे. गिरीश तर जिथे जाणं शक्य असेल; त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण करत होता आणि ती वास्तु, तो परिसर डोळ्यात स्टोअर करून घेत होता....
शे आणि ठिकसे पाहून झाल्यानंतर जेवण केलं. ह्या परिसरात मात्र फार चांगलं हॉटेल नव्हतं. ह्या वास्तुंपेक्षा अधिक आकर्षण अर्थातच सिंधू दर्शन घाटाचं होतं. लालकृष्ण अडवाणींच्या पुढाकारातून गेल्या दशकाच्या सुरुवातीला सिंधू घाट बांधण्यात आला. तो लेहपासून सुमारे १० किमी दक्षिणेला आहे आणि दरवर्षी जून महिन्यामध्ये तिथे सिंधू दर्शन महोत्सव भरतो. सिंधू नदीवरील घाट असल्याने निश्चितच विशेष वाटत होतं. पण असंसुद्धा वाटलं की घाट बांधण्यासाठी नदीला बांध घातला आहे, मर्यादित केलं आहे. लेहच्या अगदी जवळच्या प्रदेशामध्ये सिंधू नदीच्या बाजूचा भाग समतल आहे. त्यामुळे नदीचं पात्र काहीसं छोटं व संथ आहे. त्यातच घाट बांधल्यामुळे ते अजून छोटं झाल्यासारखं वाटतं. घाटाचं बांधकाम चांगलं होतं. नदीमध्ये पाय बुडवून पहुडता येत होतं. छोटासा प्रवाह आणि त्यामध्ये काही छोटी बेटं दिसत होती. लाटा फार लहान होत्या. सिंधू नदीच्या मानससरोवरापासून कराचीपर्यंतच्या प्रवासातला हा उगमाच्या तसा खूप जवळचा टप्पा; त्यामुळे नदी फार मोठी नव्हती.
संथ वाहते सिंधूमाई....
सिंधू नदी...... तो अनुभव...... खालत्सेपासून सतत सिंधू नदीची सोबत मिळत होती. आम्ही बसलो असतानाच आणखी एक मोठा मराठी पर्यटकांचा समूह आला. काश्मीरमध्ये सर्वत्र मराठी पर्यटकांनी ओळख निर्माण केलेली आहे. अगदी आमच्या हसनजींनाही ‘चांगला’ हा शब्द चांगला माहिती होता! गंमत म्हणजे ‘चांगला’ हा शब्द पुढे आम्हांला अगदी ‘चांगला’ लक्षात राहणार होता. पण अजून त्याला वेळ होता......

रौद्र सौंदर्य!
पर्वतांची दिसे दूर रांग....
सिंधू दर्शन स्थळ
भारावलेल्या अवस्थेत बराच वेळ सिंधू घाटावर पहुडलो. ऊन जाणवत होतं, पण ढगसुद्धा होते. दूरवर बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मनमुराद पहुडणं झाल्यावर व तो अनुभव मनामध्ये साठवल्यावर निघालो. वेळेअभावी हेमीस ही एक खूप मोठी गोम्पा बघता येणार नव्हती. हेमीस हे एक अभयारण्यसुद्धा आहे व ते लेह आणि झांस्कर खो-याच्या मधल्या विस्तृत भागात पसरलं आहे. हिमशिखरांकडे बघून ‘तिथे’ काय असेल, ह्याची कल्पना येत होती. पण त्याच्या दर्शनाचा योग अजून आला नव्हता............
सिंधू घाटानंतर लेह पॅलेस बघण्यासाठी गेलो. हा लेह शहराच्या पूर्व भागात एका उंच टेकडीवर आहे. इथे राजवाडा आणि संग्रहालय आहे. बराच उंचीवर होता व खालून पर्यटक पायवाटेनेसुद्धा येत होते. उंचावरून दूरवरचे बर्फाच्छादित पर्वत व खाली लेह शहर सुंदर दिसत होते.... समोरच एका डोंगरावर एक पांढरी वास्तु दिसत होती. ती म्हणजे शांती स्तुप हे समजलं. लेह- दर्शनातला ते आमचं शेवटचं स्थान होतं. ह्या सर्वच ठिकाणी पुरातत्त्वशास्त्रज्ञाला व इतिहासाच्या अभ्यासकाला भरपूर खाद्य मिळेल. पण सामान्य दृष्टीकोनातून ह्या सगळ्या वास्तू ब-याच एकसारख्या वाटतात. समोर दिसणा-या शांतीस्तुपाचा मार्ग मात्र बराचसा फिरून आणि लेह शहराच्या मध्यभागातून जात होता.
प्राचीनता आणि आधुनिकता- पांढ-या छोट्या वास्तू प्राचीन आहेत.
राजवाड्यावरून दिसणारे लेह शहर
समोर दिसणारा शांतीस्तुप आणि लेह शहराचा काही भाग
शांतीस्तुप...... लेह- दर्शनामध्ये तसे दोनच भाग मनाला भिडले. एक म्हणजे सिंधू दर्शन स्थळ आणि दुसरा शांती स्तुप!! अत्यंत भव्य; एका उंच टेकडीवर केलेलं विशाल बांधकाम. अत्यंत उत्कृष्ट आणि भव्य. उंच टेकडीवर आल्यामुळे एक मोकळेपणा येतो; प्रशस्त वाटतं. सर्व दिशांना लांबवर दिसणारे पहाड आपल्याच उंचीवर आहेत; हा (गोड) भ्रम वाटू शकतो. अत्यंत प्रसन्न वातावरण आणि भरून वाहणारे वारे. हळुहळु ते वारे आणखीनच थंड व गार झाले. उंचावर असल्यामुळे वा-यांसाठी रान मोकळे. त्यामुळे थंडी झोंबण्यास सुरुवात झाली... लदाख!
शांती स्तुपाचा कळस
समोर दिसत असलेले पर्वत.... !
शांतीस्तुपामध्ये ध्यान कक्ष आणि इतरही अनेक वास्तु आहेत. इथल्या ध्यान कक्षातील ही बुद्ध मूर्ती. ह्या मूर्तीमध्ये काही वेगळेपणा आढळतो का? बारकाईने पाहिल्यास लक्षात येऊ शकेल.
शांती स्तुपातील बुद्धमूर्ती
ही बुद्ध मूर्ती काहीशी जपानी वळणाची आहे. जपानी सरकारने हा शांतीस्तुप इथे बांधला आहे. जपानी लोकांचं काम उठून दिसतं, इतका हा स्तुप वैभवशाली व विशाल आहे.
स्तुप पाहिल्यानंतर खूप काही बघितल्याचं व अनुभवल्याचं समाधान मिळालं. संध्याकाळ झाली होती व अत्यंत थंड हवा होती. दूरवर पाऊस दिसत होता. वारे जणू आम्हांला उचलून फेकण्याच्या विचारात होते.
शांतीस्तुप पाहून परत निघालो. शांतीस्तुपापर्यंत अगदी वर वाहनं जातात आणि काही लोक लेह शहरातून चालतसुद्धा येतात....... ते सहजपणे खालून अगदी वरपर्यंत चालत येतात.....
परत जाताना खाली मुख्य वस्तीतील बाजारपेठ लागली. भरपूर दुकानं होती. बरेचसे विदेशी पर्यटकही दिसत होते. दुकानं व हॉटेल बरीच महाग असतील असं वाटलं. पण ती तशी नव्हती. अजूनही लेहमध्ये पारंपारिक साधेपणा व आतिथ्य दिसतं.
संध्याकाळी हॉटेलवर जाऊन थोडा आराम आणि मग जवळच्या इंटरनेट कॅफेला भेट दिली. दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली. हसनजींनी आमच्यासाठी परमिट आणले होते. त्यामुळे काही अडचण नव्हती. आम्ही पेंगाँग त्सो (पेंगाँग सरोवर) बघायला जाणार होतो. पण परीक्षितला किंचित त्रास होत असल्यामुळे त्याने उद्या आराम करावा असा सल्ला हसनजींनी दिला व आमच्या इथून पुढे सोबत असणा-या ड्रायव्हरशी ओळख करून दिली. त्यांचं नाव हैदरभाई होतं. सकाळी ठीक साडेपाच वाजता आम्ही निघणार होतो.
एकच दिवसात हसनजी व त्यांचे साथीदार आणि हॉटेल अगदी ओळखीचं होऊन गेलं. काश्मीर, दहशतवाद ह्याबद्दल वाटणारी चिंता कुठेच राहिली नव्हती. नेहमीच राहतो अशा सहजतेने आम्ही लेहमध्ये राहिलो. अर्थातच मनामध्ये लदाख, हिमालय व आम्ही घेत असलेला अनुभव ह्याबद्दल अनंत उत्तेजना होती......... “तिथे” असण्याचा अनुभव “तिथे” येऊ शकतो.
आम्ही “जिथे” होतो; तिथून पुढे जाताना आता आम्हांला अनेक मोठ्या घाट माथ्यावरून जायचं होतं. जणू लेहच्या आसपास असलेल्या नितांतसुंदर, श्रीमंत व समृद्ध निसर्गाचं संरक्षण करण्यास बसलेले हे ‘चांगले’ रखवालदारच! कुठेही जायचं तर चांग-ला, खार्दुंग-ला अशा रखवालदारांना जुले (लदाखी भाषेत रामराम) करूनच जावं लागणार.... आणि पुढच्या दिवशी आम्हांला चांगलाला भेटायचं होतं आणि चांगलाचा अनुभव चांगलाच येणार होता......
क्रमश:
पुढील भाग: बर्फातून चांगलामार्गे पेंगाँग त्सो......
सोनामार्गसह काश्मीरमध्ये ब-याच ठिकाणी हिमवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर आणि काश्मीरच्या चार जिल्ह्यांमधून ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट’ मागे घेण्याचा प्रस्ताव बनवण्यात आल्यानंतर भ्रमणगाथेतील पुढचं वर्णन लिहितोय...
११ ऑगस्टच्या सकाळी करगिलमधून निघून संध्याकाळी सहाच्या सुमारास लेहमध्ये पोचलो....... अभूतपूर्व अनुभव...... शब्दातीत.... लेह!! लदाख विभागाचं मुख्यालय. काश्मीरमधलं एक आगळं वेगळं शहर. सर्वच दृष्टीने एकमेव. शहर आहे, पण मोठं नाही. अत्यंत दुर्गम भागात असलं तरी आधुनिक आहे. उंची ३५०५ मीटर्स, फक्त.
लेह व एकूणच लदाख प्रदेशात हिवाळ्यामध्ये तपमान शून्यच्या खूप खाली जातं. द्रासमध्ये ते -६० अंशे से. इतकं कमी होतं, तर लेहमध्ये -२० पर्यंत जातं. त्यामुळे इथली जीवनशैली त्यानुसार घडली आहे. घरं त्यामुळेच जास्त जाड होती; भिंती, दरवाजे जास्त भक्कम होते. पर्यटकांचा अखंड ओघ असूनही अद्याप लेह साधं व आटोपशीर वाटत होतं. आकारानेसुद्धा लहानच आहे. पार्श्वभूमी व काही गोष्टी सोडल्या तर इतर शहरांसारखंच. बरीच नावं तिबेटी लिपीमध्ये दिसत होती. ही लिपी थोडीशी बंगाली लिपीच्या वळणाची आहे. कित्येक वाहनांचे क्रमांकसुद्धा तिबेटी लिपीत दिसत होते. पर्यटनाच्या उद्योगामुळे जेवण- हॉटेल, राहण्याची सोय इत्यादि बाबी इतरत्र आहेत, तशाच इथेही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे राहण्या- खाण्याचे हाल होत नाहीत.
लेह एका दुर्गम परिसराचा मध्यबिंदु आहे. खाजगी वाहनाव्यतिरिक्त प्रवासाच्या इतर सोयी जवळजवळ नगण्यच आहेत. काही बस उन्हाळ्यात श्रीनगर व मनालीच्या दिशेने जातात; पण त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे खाजगी वाहनचालक, प्रवासी एजंट ह्यांनाच जास्त प्राधान्य दिलं जातं. लेह शहरामध्ये शहर बससेवा असल्याचं समजलं. परंतु तरीही, सामान्य माणसासाठी इथला प्रवास अवघडच आहे. सर्वच परिसर दुर्गम आहे व त्यामुळे एकंदरीत जीवनशैली व राहणीमानसुद्धा काहीसं अवघड होतं. अन्य भागांना उपलब्ध असलेले पर्याय इथे उपलब्ध होत नाहीत.
तरीसुद्धा पर्यटकांसाठी खूप सोयी निर्माण झालेल्या आहेत. लेहमध्ये इंटरनेट कॅफे मिळाल्यामुळे बरं वाटलं. अर्थात हा सर्व परिसर, लदाखचं विश्व असं होतं, ज्यामध्ये इंटरनेट ह्या साधनाचाच काय, सर्व मानवनिर्मित गोष्टींचा विसर पडावा.......
संध्याकाळी लेहमध्ये काहीशी थंडी जाणवत होती. जशी महाराष्ट्रातल्या गावांमध्ये हिवाळ्यामध्ये अनुभवता येते. आल्हाददायक थंडी होती. श्वास घेताना व हालचाल करताना किंचित त्रास जाणवत होता; अर्थात काळजी वाटावी इतका तो जास्त नव्हता. संध्याकाळी वेळ मिळाल्यामुळे थोडं फार फिरलो; ज्यामुळे शरीराला त्या वातावरणाची थोडी ओळख झाली. अशी ओळख होणं गरजेचं आहे. आणि तशी द्रासच्या पुढे आल्यापासूनच ओळख होत होती. त्यामुळे शरीर कशी प्रतिक्रिया देईल, ही भिती कमी होत गेली.... लेहमध्ये ठीक होतं, पण पुढे शरीर चांगली प्रतिक्रिया देणार होतं.......
हसनजी व मोहम्मद हुसेनजींच्या रूपाने आम्हांला अत्यंत चांगले लोक मिळाल्यामुळे सर्व व्यवस्था उत्तम होती. कुठे फिरावं, कसं, कधी, काय बघण्यासारखं आहे, इत्यादिबद्दल आम्हांला आमचे ट्रॅव्हल एजंट योग्य मार्गदर्शन करत होते. रात्री दुस-या दिवशीचा कार्यक्रम ठरला. दुस-या दिवशी आम्ही लेह परिसरातील गोम्पा, राजवाडे, सिंधू घाट इत्यादि पाहणार होतो. त्यानंतर मग लदाखमधील लेहपासून दूर असलेल्या भागांमध्ये जाणार होतो. लेह आसपासच्या भेटीसाठी इनर लाईन परमिट लागत नाही; पण अन्यत्र जवळजवळ सगळीकडेच तो लागतो. आम्ही लेहच्या आसपास फिरत असताना हसनजी आमच्यासाठी पेंगाँग त्सो, नुब्रा खोरे आणि त्सो मोरिरीचा परमिट काढून ठेवणार होते.
आलो तेव्हा संध्याकाळी पडत असलेला पाऊस कमी होता; पण रात्रीसुद्धा पडतच होता. अर्थात तो फार काळजी करण्यासारखा नव्हता. हलकासा छिडकावा होता आणि ढग मोठ्या प्रमाणात पसरले होते...... लेह......
सकाळी पर्वतांवर दिसणारे कोवळे सूर्यकिरण
सकाळी दिसणारं लेहमधील नितळ आकाश...
सकाळी नितळ आकाश म्हणजे वस्तुत: काय असतं हे बघायला मिळालं. खरा निळा रंग. अत्यंत स्वच्छ, शांत, आल्हाददायक निळं आकाश...... सकाळी १० च्या सुमारास निघालो. जवळपासच्या भागातच जायचं असल्यामुळे फार घाई नव्हती.
लेह ही नामग्याल ह्या लदाखच्या पारंपारिक राजघराण्याची राजधानी. त्यामुळे राजवाडा लेहच्या जवळच होता. आम्ही लेहमधून निघून कारूच्या रस्त्याला लागलो. दक्षिण- पूर्वेकडे जाणारा हा रस्ता. हाच रस्ता लेह- मनाली महामार्ग आहे. १९८९ मध्ये लेह- मनाली महामार्ग वाहतुकीला खुला होईपर्यंत लेहला जोडणारा लेह- करगिल- श्रीनगर हाच मुख्य मार्ग होता. कारूपर्यंतचा रस्ता सपाट असल्यामुळे छान आहे. लेहच्या थोडं बाहेर पडलं की लगेचच सिंधू नदी व मग सिंधू घाट लागतो. आम्ही परत येताना तिथे थांबणार होतो.
झाडी निसर्गत: आलेली नसून जाणीवपूर्वक लावली असल्याचं लगेच जाणवतं.
लेहमधून निघाल्यानंतर शे राजवाडा व ठिकसे गोम्पा बघितले. ह्या प्राचीन वास्तु आहेत. चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. त्यावेळी तिथे विदेशी पर्यटक भरपूर होते. महाराष्ट्रीय पर्यटकांचेही काही गट दिसत होते. काही केसरीसारख्या पर्यटन संस्थेकडून आले होते; तर काही व्यक्तीगतरित्या एकत्र येऊन फिरत होते.
बाहेरून दिसणारी ठिकसे गोम्पा
गोम्पामधील प्राचीन वारसा
इतर काहीही असलं तरी विदेशी पर्यटकांमध्ये उत्साहसुद्धा भरपूर असतो....
बुद्धभूमीतील बुद्धमूर्ती
शे राजवाडा आणि ठिकसे गोम्पा ह्या वास्तु आधी बघितलेल्या लामायुरूतील गोम्पाप्रमाणे काहीशा वाटत होत्या. शे राजवाडा अत्यंत भव्य आहे. ठिकसे गोम्पा तर ब-याच उंचीवर म्हणजे एका टेकडीवर आहे. त्यामुळे टेकडी चढून ठिकसे गोम्पाच्या उंबरठ्यावर पोचतानाच दमछाक झाली. थांबत थांबत जाऊनसुद्धा. त्यामुळे मग आतमध्ये फार फिरून पाहता आलं नाही. आमच्यातला गिरीश मात्र सर्व गोष्टी बारकाईने बघत होता. संपूर्ण प्रवासामध्ये मी व परीक्षित ह्यांच्या तब्येतीचा कस लागला; पण गिरीशला मात्र कुठेही त्रास झाला नाही. जणू कोणत्याही पिचवर दमदार खेळ करणा-या कसलेल्या
फलंदाजाप्रमाणे त्याने लगेचच लदाखच्या पिचसोबत जुळवून घेतलं.
हे आणि लदाखमधल्या इतर सर्व गोष्टी बघताना माझ्यामध्ये फोटो घेण्याचं भान उरतच नव्हतं. नजारा किंवा समोरचं अद्भुत विश्व इतकं विलक्षण होतं, की इतर कशाचच भान राहू शकत नव्हतं. परंतु ह्याही परिस्थितीमध्ये माझ्या मित्रवर्यांनी- गिरीश आणि परीक्षितने फोटो घेण्याचं महान काम पूर्ण केलं व त्यामुळेच हा ब्लॉग ख-या अर्थाने साकार होतो आहे. गिरीश तर जिथे जाणं शक्य असेल; त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण करत होता आणि ती वास्तु, तो परिसर डोळ्यात स्टोअर करून घेत होता....
शे आणि ठिकसे पाहून झाल्यानंतर जेवण केलं. ह्या परिसरात मात्र फार चांगलं हॉटेल नव्हतं. ह्या वास्तुंपेक्षा अधिक आकर्षण अर्थातच सिंधू दर्शन घाटाचं होतं. लालकृष्ण अडवाणींच्या पुढाकारातून गेल्या दशकाच्या सुरुवातीला सिंधू घाट बांधण्यात आला. तो लेहपासून सुमारे १० किमी दक्षिणेला आहे आणि दरवर्षी जून महिन्यामध्ये तिथे सिंधू दर्शन महोत्सव भरतो. सिंधू नदीवरील घाट असल्याने निश्चितच विशेष वाटत होतं. पण असंसुद्धा वाटलं की घाट बांधण्यासाठी नदीला बांध घातला आहे, मर्यादित केलं आहे. लेहच्या अगदी जवळच्या प्रदेशामध्ये सिंधू नदीच्या बाजूचा भाग समतल आहे. त्यामुळे नदीचं पात्र काहीसं छोटं व संथ आहे. त्यातच घाट बांधल्यामुळे ते अजून छोटं झाल्यासारखं वाटतं. घाटाचं बांधकाम चांगलं होतं. नदीमध्ये पाय बुडवून पहुडता येत होतं. छोटासा प्रवाह आणि त्यामध्ये काही छोटी बेटं दिसत होती. लाटा फार लहान होत्या. सिंधू नदीच्या मानससरोवरापासून कराचीपर्यंतच्या प्रवासातला हा उगमाच्या तसा खूप जवळचा टप्पा; त्यामुळे नदी फार मोठी नव्हती.
संथ वाहते सिंधूमाई....
सिंधू नदी...... तो अनुभव...... खालत्सेपासून सतत सिंधू नदीची सोबत मिळत होती. आम्ही बसलो असतानाच आणखी एक मोठा मराठी पर्यटकांचा समूह आला. काश्मीरमध्ये सर्वत्र मराठी पर्यटकांनी ओळख निर्माण केलेली आहे. अगदी आमच्या हसनजींनाही ‘चांगला’ हा शब्द चांगला माहिती होता! गंमत म्हणजे ‘चांगला’ हा शब्द पुढे आम्हांला अगदी ‘चांगला’ लक्षात राहणार होता. पण अजून त्याला वेळ होता......
रौद्र सौंदर्य!
पर्वतांची दिसे दूर रांग....
सिंधू दर्शन स्थळ
भारावलेल्या अवस्थेत बराच वेळ सिंधू घाटावर पहुडलो. ऊन जाणवत होतं, पण ढगसुद्धा होते. दूरवर बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मनमुराद पहुडणं झाल्यावर व तो अनुभव मनामध्ये साठवल्यावर निघालो. वेळेअभावी हेमीस ही एक खूप मोठी गोम्पा बघता येणार नव्हती. हेमीस हे एक अभयारण्यसुद्धा आहे व ते लेह आणि झांस्कर खो-याच्या मधल्या विस्तृत भागात पसरलं आहे. हिमशिखरांकडे बघून ‘तिथे’ काय असेल, ह्याची कल्पना येत होती. पण त्याच्या दर्शनाचा योग अजून आला नव्हता............
सिंधू घाटानंतर लेह पॅलेस बघण्यासाठी गेलो. हा लेह शहराच्या पूर्व भागात एका उंच टेकडीवर आहे. इथे राजवाडा आणि संग्रहालय आहे. बराच उंचीवर होता व खालून पर्यटक पायवाटेनेसुद्धा येत होते. उंचावरून दूरवरचे बर्फाच्छादित पर्वत व खाली लेह शहर सुंदर दिसत होते.... समोरच एका डोंगरावर एक पांढरी वास्तु दिसत होती. ती म्हणजे शांती स्तुप हे समजलं. लेह- दर्शनातला ते आमचं शेवटचं स्थान होतं. ह्या सर्वच ठिकाणी पुरातत्त्वशास्त्रज्ञाला व इतिहासाच्या अभ्यासकाला भरपूर खाद्य मिळेल. पण सामान्य दृष्टीकोनातून ह्या सगळ्या वास्तू ब-याच एकसारख्या वाटतात. समोर दिसणा-या शांतीस्तुपाचा मार्ग मात्र बराचसा फिरून आणि लेह शहराच्या मध्यभागातून जात होता.
प्राचीनता आणि आधुनिकता- पांढ-या छोट्या वास्तू प्राचीन आहेत.
राजवाड्यावरून दिसणारे लेह शहर
समोर दिसणारा शांतीस्तुप आणि लेह शहराचा काही भाग
शांतीस्तुप...... लेह- दर्शनामध्ये तसे दोनच भाग मनाला भिडले. एक म्हणजे सिंधू दर्शन स्थळ आणि दुसरा शांती स्तुप!! अत्यंत भव्य; एका उंच टेकडीवर केलेलं विशाल बांधकाम. अत्यंत उत्कृष्ट आणि भव्य. उंच टेकडीवर आल्यामुळे एक मोकळेपणा येतो; प्रशस्त वाटतं. सर्व दिशांना लांबवर दिसणारे पहाड आपल्याच उंचीवर आहेत; हा (गोड) भ्रम वाटू शकतो. अत्यंत प्रसन्न वातावरण आणि भरून वाहणारे वारे. हळुहळु ते वारे आणखीनच थंड व गार झाले. उंचावर असल्यामुळे वा-यांसाठी रान मोकळे. त्यामुळे थंडी झोंबण्यास सुरुवात झाली... लदाख!
शांती स्तुपाचा कळस
समोर दिसत असलेले पर्वत.... !
शांतीस्तुपामध्ये ध्यान कक्ष आणि इतरही अनेक वास्तु आहेत. इथल्या ध्यान कक्षातील ही बुद्ध मूर्ती. ह्या मूर्तीमध्ये काही वेगळेपणा आढळतो का? बारकाईने पाहिल्यास लक्षात येऊ शकेल.
शांती स्तुपातील बुद्धमूर्ती
ही बुद्ध मूर्ती काहीशी जपानी वळणाची आहे. जपानी सरकारने हा शांतीस्तुप इथे बांधला आहे. जपानी लोकांचं काम उठून दिसतं, इतका हा स्तुप वैभवशाली व विशाल आहे.
स्तुप पाहिल्यानंतर खूप काही बघितल्याचं व अनुभवल्याचं समाधान मिळालं. संध्याकाळ झाली होती व अत्यंत थंड हवा होती. दूरवर पाऊस दिसत होता. वारे जणू आम्हांला उचलून फेकण्याच्या विचारात होते.
शांतीस्तुप पाहून परत निघालो. शांतीस्तुपापर्यंत अगदी वर वाहनं जातात आणि काही लोक लेह शहरातून चालतसुद्धा येतात....... ते सहजपणे खालून अगदी वरपर्यंत चालत येतात.....
परत जाताना खाली मुख्य वस्तीतील बाजारपेठ लागली. भरपूर दुकानं होती. बरेचसे विदेशी पर्यटकही दिसत होते. दुकानं व हॉटेल बरीच महाग असतील असं वाटलं. पण ती तशी नव्हती. अजूनही लेहमध्ये पारंपारिक साधेपणा व आतिथ्य दिसतं.
संध्याकाळी हॉटेलवर जाऊन थोडा आराम आणि मग जवळच्या इंटरनेट कॅफेला भेट दिली. दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली. हसनजींनी आमच्यासाठी परमिट आणले होते. त्यामुळे काही अडचण नव्हती. आम्ही पेंगाँग त्सो (पेंगाँग सरोवर) बघायला जाणार होतो. पण परीक्षितला किंचित त्रास होत असल्यामुळे त्याने उद्या आराम करावा असा सल्ला हसनजींनी दिला व आमच्या इथून पुढे सोबत असणा-या ड्रायव्हरशी ओळख करून दिली. त्यांचं नाव हैदरभाई होतं. सकाळी ठीक साडेपाच वाजता आम्ही निघणार होतो.
एकच दिवसात हसनजी व त्यांचे साथीदार आणि हॉटेल अगदी ओळखीचं होऊन गेलं. काश्मीर, दहशतवाद ह्याबद्दल वाटणारी चिंता कुठेच राहिली नव्हती. नेहमीच राहतो अशा सहजतेने आम्ही लेहमध्ये राहिलो. अर्थातच मनामध्ये लदाख, हिमालय व आम्ही घेत असलेला अनुभव ह्याबद्दल अनंत उत्तेजना होती......... “तिथे” असण्याचा अनुभव “तिथे” येऊ शकतो.
आम्ही “जिथे” होतो; तिथून पुढे जाताना आता आम्हांला अनेक मोठ्या घाट माथ्यावरून जायचं होतं. जणू लेहच्या आसपास असलेल्या नितांतसुंदर, श्रीमंत व समृद्ध निसर्गाचं संरक्षण करण्यास बसलेले हे ‘चांगले’ रखवालदारच! कुठेही जायचं तर चांग-ला, खार्दुंग-ला अशा रखवालदारांना जुले (लदाखी भाषेत रामराम) करूनच जावं लागणार.... आणि पुढच्या दिवशी आम्हांला चांगलाला भेटायचं होतं आणि चांगलाचा अनुभव चांगलाच येणार होता......
क्रमश:
पुढील भाग: बर्फातून चांगलामार्गे पेंगाँग त्सो......
Labels:
Buddha,
Himalaya,
India,
Indus,
Kashmir,
Ladakh,
Lama,
Leh,
peace,
Shanti Stupa,
Sindhu,
travel
Sunday, October 16, 2011
लदाखची भ्रमणगाथा: भाग ५
अब तो हमे आगे है बढते रहना......
सिंधू नदीची सोबत
जम्मु काश्मीरमधील विधानसभेमध्ये अफजल गुरूला जीवदान देण्याच्या ठरावावरून गदारोळ झाल्यानंतर आणि नुकताच बनिहालजवळ रेल्वेचा आशियातला दुसरा सर्वांत मोठा बोगदा खुला झाल्यानंतर वर्णनाचा हा भाग लिहितोय. रेल्वे काश्मीर व पूर्वांचलमध्ये अत्यंत महान कार्य करत आहे. काश्मीरमध्ये आता अगदी श्रीनगर- बारामुल्लापर्यंत रेल्वे पोचली आहे. भारतात घडणा-या ह्या काही मोजक्या चांगल्या घटना...
करगिलमध्ये संध्याकाळी पोचल्यानंतरचा दिवस मस्त गेला होता. थोडफार फिरलो, गाव थोडसं पाहिलं, सुरू नदीचा रोरावणारा सूर ऐकला. गावाच्या चारही बाजूंना असलेले डोंगर बघितले. करगिलमधलं आमचं हॉटेल तसं सामान्यच होतं, तरीसुद्धा तिथे वीजेची चांगली सोय होती. आधी ऐकलं होतं की काश्मीर व लदाखमध्ये वीज पुरवठा अत्यंत कमी आहे. परंतु इथेतरी लॅपटॉप व मोबाईल व्यवस्थित चार्ज होत होते.
पर्यटन उद्योगाचा ब-याच प्रमाणात प्रभाव असल्यामुळे हॉटेलमधले कर्मचारीसुद्धा चांगली सेवा देत होते. दुस-या दिवशी बरोबर पहाटे साडेपाच वाजता गरम पाणी आणून दिलं.
करगिलमधली पहाट!! शब्दातीत अनुभवांमधलाच एक असूनसुद्धा ‘एकमेव!’ आकाशात सप्तर्षी दिसत होते. गंमत म्हणजे ते उलटे दिसत होते. करगिल जवळजवळ ३४.५ उत्तर अक्षांशावर असल्यामुळे तिथे ३४.५ उत्तर अंश इतक्या आकाशातले तारे मावळणार नाहीत. त्यामुळे ध्रुव तारासुद्धा नेहमीच्या २० अंशांऐवजी ३४ अंश इतका बराच वर दिसत होता व सप्तर्षी वर आल्यामुळे मावळत नव्हते. हवा थंड पण आल्हाददायक होती. सूर्योदय बघायला मिळेल असं वाटलं; पण ढग होते आणि डोंगरापलीकडे सूर्योदय झाला. सकाळची प्रसन्न हवा, करगिल आणि सुरूगर्जना!! जन्नत, जन्नत!!
करगिल गाव व सुरू नदी
सकाळी लवकर निघालो. आज करगिलमधून निघून मुलबेक- लामायुरू- खालत्से- पत्थरसाहीबमार्गे लेहला पोचायचं होतं. खालत्सेपासून सिंधू नदी सोबत येणार होती......
करगिलमध्ये पेट्रोल भरलं. दूरवर हिमाच्छादित पर्वत दिसत होते. पेट्रोलपंपाच्या समोर, रस्त्याला लागूनच एक कोसळलेलं घर होतं. हसनजींनी सांगितलं की ते घर करगिल युद्धामध्ये पाकिस्तानच्या तोफेच्या मा-यामुळे मोडलं होतं......... युद्धाची, अशांततेची व त्याबरोबर सेनेच्या पराक्रमाची व लोकांच्या धैर्यशीलतेच्या अशा खुणा सतत सोबत होत्या...
करगिलच्या जवळून श्रीनगर- लेह मार्ग जातो. गावाबाहेर येऊन परत महामार्ग गाठला. महामार्ग नावालाच; कारण इथल्या पर्वतांमुळे, द-यांमुळे व प्रतिकूल हवामानामुळे तो क्वचितच कुठे मोठा रस्ता दिसतो. साधारणत: जेमतेम मोठी ट्रक जाऊ शकेल असाच मार्ग. आणि क्रॉसिंगच्या जागाही कमीच.
सोनामार्गच्या पुढे नेहमी होणा-या चकमकी, घुसखोरी, अतिरेकी हल्ले ह्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे तिथून पुढच्या भागामध्ये सेनेची जी वर्दळ दिसते ती एक तर नियंत्रण रेषेलगतच्या तळांना पुरवठा करणारी व नियंत्रण रेषेलगतच्या चौक्यांची असते. ही वर्दळसुद्धा प्रचंड असते. सेनेचे ट्रक्स मोठ्या संख्येने काफिल्यामधून जात राहतात. तितका वेळ इतर वाहतूक थोडी अडकून पडते.
करगिलहून पुढे निसर्गामध्ये हिरवा रंग कमी कमी होत जाऊन गुलाबी, करडा, लाल, पिवळा असे रंग दिसत जातात. करगिलजवळची हिरवळ- झाडी व शेतीसुद्धा बरीच कृत्रिम, मानवनिर्मित आहे. डोंगरांचा नव्हे पर्वतांचा आकार मात्र अजून मोठा, भव्य, अतिभव्य होत जातो. जणू संख्या ज्याप्रमाणे खर्व, निखर्व, पद्म, महापद्म अशा अनंताकडे जातात, त्याप्रमाणे पर्वत अतिभव्य, त्याहूनही अतिभव्य होत जात होते. ही भव्यता, व्यापकता विराट होती! शब्दातीत, इंद्रियातीत व भावातीतसुद्धा......
रस्त्यालगतचा प्रदेशसुद्धा रूप बदलतो. वस्ती जवळजवळ विरळ होत जाते. क्वचित कुठे काही लोक दिसले तर दिसतात. मुख्य वस्ती सेना, सीमा सडक संगठन अशीच दिसते. गावंसुद्धा विशेष नाहीच. मधून मधून छोटी हॉटेल्स किंवा दुकान दिसतात. अन्यथा एकदम निर्जन प्रदेश. रस्त्यावरची वाहतुकसुद्धा तुरळकच; कारण ती नियंत्रित केलेली असते. रस्ता मात्र काहीसा ठीक आहे. कारण झोजिला ओलांडल्यानंतर पुढे मुख्य असे दोनच घाट (ला) आहेत. नमिकेला आणि फोटूला. फोटूला जरी श्रीनगर- लेह रस्त्यावरचा सर्वोच्च बिंदु असला, तरी घाटमाथा म्हणून तो आणि नमिकेलासुद्धा विशेष दुर्गम नाहीत आणि ते हिवाळ्यातही चालू असतात. त्यामुळे प्रवास काहीसा सुकर आहे.
करगिल सोडल्यावर लगेचच एक रस्ता बटालिककडे जातो व पुढे एक रस्ता दक्षिण मध्य काश्मीरमधील झांस्कर भागात जातो. इथे जाण्यासाठीसुद्धा आयएलपी- इनर लाईन परमिट घ्यावा लागतो. लदाखमध्ये लेहच्या आसपासचा परिसर वगळता इतर सर्व प्रेक्षणीय स्थळांसाठी इनर लाईन परमिट घ्यावा लागतो; कारण हा सर्व भाग नियंत्रण रेषेला लागूनच व सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात आहे. त्यामुळे तिथली वाहतूक व पर्यटन नियंत्रित आहे, जे अगदी योग्य आहे.
करगिल गाव सोडल्यापासून पुढे सुमारे साठ किलोमीटर्सवर मुलबेक हे पहिलं मोठं गाव येतं. इथे मैत्रेय बुद्धाची विशाल मूर्ती दिसते. मूर्तीजवळच एक गोम्पा आहे आणि तिच्यामध्ये गोल फिरणारं चक्र आहे. खास लदाख शैलीच्या गोम्पा (बौद्ध मठ) इथून सुरू होतात. मुलबेकच्या आसपास अत्यंत कोरडे पाषाण म्हणता येतील असे उंच व विशाल पर्वत आहेत. त्या पर्वतांमध्ये गुहांसारख्या काही फटी किंवा बंदिस्त चौकटी दिसत होत्या. कानावर आलं की सततच्या वाहत्या वा-यामुळे पहाड झिजून तशा फटी निर्माण झाल्या आहेत. पण विश्वास बसला नाही. कारण मुलबेकच्या खूप आधीपासून त्या स्वरूपाचे मोठे पहाड दिसत होते; पण तशी रचना/ वा-यामुळे झालेली झीज आधी कुठेच दिसली नाही. आणि त्या फटींना साचेबद्ध चौकटींचे स्वरूपसुद्धा होते. मनातून वाटलं की त्यासुद्धा जुन्या गोम्पा किंवा त्याहूनही भव्य वास्तूच असाव्यात. पुढेही अशा प्रकारच्या पहाडातील रचना दिसत होत्या.
वर दिसणा-या रचना नैसर्गिक आहेत असं वाटत नव्हतं. नक्कीच ह्या जुन्या वास्तू असल्या पाहिजेत....
मैत्रेय बुद्धाची मूर्ती बरीच जुनी होती व खूप उंच होती. आतमध्ये एक मठ आहे. तिथे फिरताना मात्र चांगलं जाणवत होतं, की आपण उंचावर आणि विरळ हवेच्या ठिकाणी आहोत. पाच- दहा मिनिटातच शरीराचा विरोध लक्षात यायचा. मुलबेक गाव छोटसंच आहे. तिथे एका नेपाळी हॉटेलमध्ये नाश्ता कम जेवण करून पुढे निघालो. आता पुढे नमिकेला हा घाटमाथा होता.
वैराण, उजाड, रुक्ष परंतु तरीसुद्धा विराट, अतिभव्य, विलक्षण, अमानवी प्रदेश होता सर्व. उंचच उंच पहाड. काही श्रेष्ठतम पहाडांना श्वेत शिरपेचाचा मान..... अत्यंत भन्नाट दृश्य निरंतर चालूच होतं. विश्वरूपदर्शनाप्रमाणे हे हिमालय दर्शन होतं.
नमिकेला हा घाटमाथा फारसा दुर्गम नाही. करगिलच्या पुढे रस्ते पसरलेले आहेत, एकदमे उभे- खाली असे नाहीत. त्यामुळे घाटही फार अवघड असे नाहीत. नमिकेलाची उंचीही जेमतेम ३५०० मीटर्स होती; त्यामुळे तो विशेष वाटला नाही. पुढे जाताना एका ठिकाणी मात्र रस्त्यावर एक दरड कोसळली होती व तिचा मलबा जेसीबीद्वारे काढत होते. त्यामुळे थोडा वेळ वाहतूक थांबली होती. तिथून पुढे लामायुरू ही लदाखमधील सर्वांत मोठी गोम्पा (स्पेलिंग Gonpa आहे) लागते. रस्त्याच्या किंचित बाजूला उतारावरच्या डोंगरावर ह्या गोम्पाची मोठी वास्तु पसरली आहे. भरपूर भव्य व समृद्ध आहे. पर्यटकांनी गजबजलेली होती. मुलबेकप्रमाणे इथेही महाराष्ट्रीयन पर्यटक भेटले. बरेचसे विदेशीही होते. लामायुरू साधारणपणे करगिल व लेहच्या मध्यावर येतं. रस्त्यापासून थोड्या चढावर मुख्य वास्तू होती. जुन्या काळातील बरेचसे ग्रंथ, शिल्प, स्मारकं होती. लामा मोठ्या संख्येने दिसत होते. बुद्धमूर्ती ब-याच होत्या. आतमधील चित्रांमध्ये व शिल्पांमध्ये थोडीशी ड्रॅगन शैली दिसत होती... चीनी प्रभाव असावा.
वर उजवीकडे पिवळ्या रंगाचा भाग दिसतोय, तो मूनलँड.
लामायुरूच्या लगतच्या परिसराला मूनलँड म्हणतात. कारण हा परिसर अक्षरश: चंद्राप्रमाणे दिसतो. खडकाळ, लालसर पिवळा रंग. लामायुरूपासून पुढे फोटूला व खालत्से लागतात. फोटूलावर एक प्रसारभारती केंद्र व कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी होते ते तिबेटी मंत्र कापडाच्या पट्ट्यांवर लिहिलेले होते. फोटूलाची उंचीही चार हजार मीटर्सच्या आसपास आहे. तिथे थंडी तितकी जाणवत नव्हती. परंतु भरपूर वारे वाहत होते.
खालत्से इथेही गोम्पा आहे. इथे येईपर्यंत दुपारचे तीन वाजून गेले होते. लेहला संध्याकाळपर्यंत पोचायच्या दृष्टीने फार वेळ थांबलो नाही. खालत्सेचं वैशिष्ट्य म्हणजे इथून सिंधू नदी सोबत येते. इथून पुढे ती लेहपर्यंत व लेहच्या पुढेही काही ठिकाणी सोबत करणार होती. सिंधु नदी...... शब्दातीत, भावातीत, कल्पनातीत, इंद्रियातीत असं अतीत सांगत होती. अवर्णनीय आणि अमूर्त.
ज्या नदीमुळे संस्कृती निर्माण झाली, ज्या नदीमुळे आजही देशाला नाव मिळालेलं आहे, त्या नदीच्या किनारी पोचलो होतो. हा अनुभव शब्दांच्या कित्येक लाख प्रकाशवर्ष पुढचा आहे. तिथे भावच हवा आणि अनुभवच हवा. एकदा नव्हे अनेकदा जाऊनच यावं. मनामध्ये तीव्र ऊर्मी होती की सरळ पुढे जावं आणि पहाडामध्ये विलीन व्हावं..... नदीचा प्रवाह अर्थातच आमच्या उलट दिशेने म्हणजे पश्चिमेकडे जात होता..........
सिंधू नदीच्या सोबत पुढचा प्रवास सुरू झाला.... नदी कधी उजवीकडे तर कधी डावीकडे होती. आता लेह जवळ येत चाललं. नदीचं पात्र लहान- मध्यम आकाराचं होतं. गर्जना होतीच आणि पाणी अर्थातच खूप ताजं व थंड होतं. प्रवाहीपणा... जीवन.... एक उगम, धारा असंख्य....
खालत्सीपासून रस्ता ब-यापैकी समतल झाला. लक्ष्य चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नजारा होता. किंबहुना लक्ष्य चित्रपटात दाखवलेले भागसुद्धा ओळखता येत होते... समतल पक्का रस्ता आणि लांब उंचावर डोंगर..... आहा हा..... अद्भुत..... न भूतो....

खालत्सीपासून रस्ता ब-यापैकी समतल झाला. लक्ष्य चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नजारा होता. किंबहुना लक्ष्य चित्रपटात दाखवलेले भागसुद्धा ओळखता येत होते... समतल पक्का रस्ता आणि लांब उंचावर डोंगर..... आहा हा..... अद्भुत..... न भूतो....

खालत्सेपासून पुढे निम्मू नावाचं एक गाव आहे. इथे सिंधू आणि झांस्कर नद्यांचा संगम आहे. आम्ही खूप वेळापासून ह्या संगमाची वाट पाहत होतो. दक्षिण मध्य काश्मीरच्या झांस्कर पर्वतराजींमध्ये उगम पावणारी झांस्कर नदी इथे सिंधू नदीला येऊन मिळते. ते दृश्य अत्यंत सुंदर होतं. खरं तर मुख्य रस्ता ब-याच उंचीवरून जात होता. परंतु आमची इच्छा लक्षात घेऊन हसनजींनी गाडी थेट नदीपर्यंत नेली. तिथे गेल्यावरचा अनुभव..... अहा हा..... सिंधू नदीच्या किना-यावर.... इथे नदीचं पात्र भरपूर मोठं होतं. मध्यम आकाराच्या लाटासुद्धा होत्या. नदीच्या पाण्याचा स्पर्श मात्र अत्यंत थंड होता. त्यामुळे फक्त तळपाय नदीमध्ये बुडवून वाळूत बसलो.... पलीकडच्या बाजूला झांस्कर येऊन सिंधूला मिळत होती. वाळूतच एक घर नवीन बांधलेलं दिसत होतं.
पाणी अत्यंत थंड असल्यामुळे मधून मधून पाय बाहेर काढावा लागत होता. त्यावेळी तिथे पाऊस पडत होता. मधूनच जरा मोठी सर येऊन गेली. दूरवर झांस्कर नदीमध्ये लाटा व वावटळ दिसत होती. तिथून एक रस्तासुद्धा येत होता. लदाखच्या अतिदुर्गम भागामध्ये सीमा सडक संगठनच्या गौरवशाली कार्याची ती एक खूण होती.
पावसामुळे मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. लदाखमध्ये सहसा पाऊसच पडत नाही. आणि पडला तर फार हानीकारक असतो. गेल्या वर्षीच्या ढगफुटीच्या आठवणी ताज्याच होत्या.... सिंधू नदीच्या आसमंतात पहुडल्यावर परत जायला निघालो..... अनिच्छेनेच. पण सिंधू नदी खूप वेळ सोबत करणार होती. बाजूचा रस्ता परत घेऊन वर येऊन मुख्य रस्त्याला लागलो. आता पुढे पत्थरसाहीब आणि मग लेह.....
पत्थरसाहीब हा एक अत्यंत मोठा गुरूद्वारा आहे. अर्थातच तो खूप समृद्ध व ऐसपैस आहे. ह्या ठिकाणी एका टेकडीवर एका राक्षसाने गुरू नानकांवर मोठा दगड मारला पण गुरू नानकांना काही इजा झाली नाही अशी कथा सांगितली जाते. नानकांवर फेकलेला दगड (पत्थर साहीब) आणि ती टेकडी दाखवतात. खूप मोठ्या परिसरात हा गुरूद्वारा आहे. इथून आम्ही निघालो तेव्हा अत्यंत सोसाट्याचा वारा सुरू झाला होता. चांगला पाऊससुद्धा पडत होता. वा-याचा जोर भयानक होता. भितीदायक होता. आमचे हसनजी आम्हांला लवकर निघायला सांगत होते.
पुढे वाटेत एका जागी मॅग्नेटिक हिल लागते. इथे गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य होते, असं म्हणतात. म्हणजे न्युट्रल गेअरवर गाडी ठेवली व तिला ढकललं तर ती डोंगर चढते, असं म्हणतात. वेळ नव्हता, अंधार पडला होता व भयानक पाऊस होता म्हणून पुढे सरळ निघालो.... पत्थरसाहीबपासून पुढे आमच्या रस्त्यात एक सुंदर पूर्ण इंद्रधनुष्य दिसत होतं. अद्भुत नजारा होता...... फक्त वारा इतका सुसाट होता, की खिडक्या पूर्ण बंद करून घ्यावा लागल्या. इंद्रधनुष्याच्या जणू खालूनच आम्ही गेलो. संध्याकाळची वेळ व जोरदार वाहणारे वारे ह्या वातावरणात आम्ही लेह शहरामध्ये प्रवेश केला......
लेह अगदी आधुनिक शहर आहे. फक्त लोकसंख्या अन्य मेट्रो किंवा महानगरांइतकी नाही. छान वाटत होतं शहर. आणि का वाटणार नाही. इतक्या अतिभव्य व विशाल तरीही वैराण प्रदेशातून आलो होतो. मुख्य रस्त्याने येऊन थोड्याच वेळात हॉटेलवर येऊन पोचलो. आम्ही फोनवर बोललो होतो ते ट्रॅव्हल एजंट श्री मोहंमद हुसेन भेटले. लवकरच रूम मिळाली. त्यांची संपूर्ण प्रवासातली व वास्तव्यातली सेवा अप्रतिम अशीच होती. काहीच उणीव नाही. काहीच अडचण नाही. अखंड सौजन्य. लदाखी संस्कृतीमधला साधेपणा आणि आपुलकी......
तब्येतीला त्रास नव्हता. थंडीही फार नव्हती. चालताना किंचित हळु चालावं लागत होतं. बोलतानाही जरा थांबून बोलावं लागत होतं. पण अन्य काहीच त्रास नाही. तिथे इंटरनेट कॅफेही मिळाला. बंद पडलेले काही फोन्स सुरू झाले.
लेह..... एका अतिरोमांचक महायात्रेच्या मुख्य टप्प्यावर आम्ही आलो होतो. प्रत्येक वेळी स्वत:ला चिमटा काढून खात्री करून घ्यावीशी वाटत होती, की आम्ही “लेह”मध्ये आहोत, आम्ही “इथे” आहोत...... एका आगळ्यावेगळ्या जगामध्ये आमचा प्रवेश झाला आहे...... तिबेट हे जगाचं छप्पर मानलं जातं. आम्ही लेह म्हणजे तिबेटच्या उंबरठ्यावर होतो. सर्वच दृष्टीने अत्यंत रोमांचक क्षण....... अपूर्व.... अमूर्त.... अनंत..... अनादी.....
क्रमश:
(फोटो सौजन्य: परीक्षित आणि गिरीश)
पुढील भाग: लेहदर्शन
Subscribe to:
Posts (Atom)